Shravan 2025: स्वच्छ पाणी म्हणून RO च्या भानगडीत पडू नका! श्रावणात पिंडीवर असा जलाभिषेक फळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shivling Abhishek Rules: श्रावण महिन्यात बरेच लोक पूजा करताना दररोज शिवलिंगावर जल अर्पण करतात. शिवलिंगावर गंगाजल अर्पण करणे सर्वात पवित्र मानले जाते. पण, शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करावं म्हणून बरेच लोक आरओ पाणी देखील अर्पण करतात. पण शिवलिंगावर आरओ पाणी अर्पण करावे की नाही?
मुंबई : लवकर पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे, श्रावण महिना धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिना महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात शिवलिंगावर जल अर्पण, रुद्राभिषेक आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. श्रावणात पूर्ण विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा केल्यानं सर्व पापांपासून मुक्तता मिळते. श्रावण महिन्यात बरेच लोक पूजा करताना दररोज शिवलिंगावर जल अर्पण करतात. शिवलिंगावर गंगाजल अर्पण करणे सर्वात पवित्र मानले जाते. पण, शिवलिंगावर शुद्ध पाणी अर्पण करावं म्हणून बरेच लोक आरओ पाणी देखील अर्पण करतात. पण शिवलिंगावर आरओ पाणी अर्पण करावे की नाही? शास्त्रांनुसार काय नियम आहे ते जाणून घेऊया.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते. गंगाजल उपलब्ध नसेल तर भगवान शिवाला स्वच्छ नदी, विहीर किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करता येतो. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, पाण्यात जीवन देणारी शक्ती असावी. हे पाणी केवळ शुद्धच नसावे, तर त्यात नैसर्गिक गुणधर्म देखील असले पाहिजेत. आरओ पाणी प्रत्यक्षात गाळण्याच्या प्रक्रियेतून जाते, ज्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे विरघळलेले खनिजे पाण्यातून काढून टाकली जातात. हे पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु त्याचे नैसर्गिक गुणधर्म कमी झालेले असतात.
advertisement
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, रासायनिक प्रक्रियेने शुद्ध केलेले पाणी देवांना अर्पण करू नये. आरओ पाणी शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे, कारण त्यात नैसर्गिक गुणधर्म नसतात. शिवतत्व निसर्गाशी जोडलेले आहे आणि त्याला अर्पण केलेले पाणी देखील नैसर्गिक असले पाहिजे. आपल्याकडे आरओ पाण्याशिवाय दुसरे कोणतेही शुद्ध पाणी उपलब्ध नसेल, तर त्यात गंगाजल घालून आरओ पाणी शुद्ध करता येते. जलाभिषेकात हातपंपाचे स्वच्छ पाणी देखील वापरले जाऊ शकते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप, गंगाजल, नारळजल आणि फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या सर्व गोष्टी जीवनाशी संबंधित मानल्या जातात आणि महादेवाला देखील प्रिय आहेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 9:18 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan 2025: स्वच्छ पाणी म्हणून RO च्या भानगडीत पडू नका! श्रावणात पिंडीवर असा जलाभिषेक फळदायी