Rahul Gandhi: "खरे भारतीय असता तर हे बोलला नसता”; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Last Updated:

Supreme Court On Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना चीनने भारतीय हद्दीवर कब्जा केल्याच्या दाव्यावर फटकारले. न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर 'काहीही बोलण्यासाठी' केला जाऊ शकत नाही असे म्हटले.

News18
News18
भारतीय हद्दीतील मोठा भाग चीनच्या लष्कराने ताब्यात घेतल्याच्या राहुल गांधी यांच्या दाव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तुम्ही खरे भारतीय असता तर असे बोलला नसता, अशा शब्दांत न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्याला हे कसे कळले की चीनने भारताची शेकडो किलोमीटर जमीन बळकावली आहे, असा सवाल केला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर ‘काहीही बोलण्यासाठी’ केला जाऊ शकत नाही, असेही म्हटले.
2020 मध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या संदर्भात भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानांबद्दल राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यातील कार्यवाहीला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने ही कठोर टिप्पणी केली.
advertisement
काँग्रेस नेत्याने दावा केला होता की, 2000 चौरस किलोमीटर भारतीय हद्दीवर चीनने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. त्यांनी असाही दावा केला होता की, अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिक भारतीय लष्कराच्या जवानांना मारहाण करत आहेत.
न्यायालयाची कठोर टिप्पणी
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांना अंतरिम दिलासा दिला असला तरी, त्यांनी काँग्रेस नेत्याच्या या विधानांवर नाराजी व्यक्त करत जोरदार तोंडी टिप्पणी केली, असे ‘लाईव्ह लॉ’ने (Live Law) वृत्त दिले आहे.
advertisement
राहुल गांधी यांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, जर विरोधी पक्षाच्या नेत्याला असे मुद्दे मांडता येत नसतील, तर ती एक दुर्दैवी परिस्थिती असेल.‘लाईव्ह लॉ’ने त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या या गोष्टी जर त्यांना बोलता येत नसतील, तर ते विरोधी पक्षनेते राहू शकत नाहीत.
advertisement
यावर न्यायमूर्ती दत्ता यांनी राहुल गांधी यांनी हे मुद्दे संसदेत मांडण्याऐवजी सोशल मीडियावर का मांडले, असा सवाल केला. ते म्हणाले, तुम्हाला जे काही बोलायचे आहे, ते संसदेत का बोलत नाही? तुम्ही सोशल मीडिया पोस्टमध्ये हे का बोलत आहात? केवळ तुम्हाला १९(१)(अ) [अभिव्यक्ती स्वातंत्र्य] मिळाले आहे म्हणून तुम्ही काहीही बोलू शकत नाही.
advertisement
न्यायमूर्ती दत्ता यांनी सिंघवी यांना पुढे विचारले की, 2000 चौरस किलोमीटर भारतीय हद्दीवर चीनने कब्जा केला आहे, हे त्यांना कसे कळले? तुम्ही तिथे होता का? तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का? कोणत्याही पुराव्याशिवाय तुम्ही अशी विधाने का करता? तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही हे सर्व बोलला नसता. जेव्हा सीमेवर संघर्ष होतो, तेव्हा दोन्ही बाजूने जीवितहानी होणे असामान्य आहे का? असे न्यायमूर्तींनी विचारल्याचे वृत्त त्या माध्यमांनी दिले आहे.
advertisement
मानहानीचा खटला काय आहे?
सिंघवी म्हणाले की, अशा तक्रारी दाखल करणे म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला त्रास देण्याचा एक मार्ग आहे. त्यांनी असेही सांगितले की, BNSS च्या कलम २२३ नुसार, न्यायालयाने फौजदारी तक्रारीवर कारवाई करण्यापूर्वी आरोपीचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे, पण या प्रकरणात असे झाले नाही. मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी यापूर्वी उच्च न्यायालयात कलम २२३ चा हा मुद्दा उपस्थित केला गेला नव्हता, असे नमूद केले.
advertisement
या मुद्द्यावर विचार करण्याचे न्यायालयाने मान्य केले आणि नोटीस बजावली.
29 मे रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्याची मानहानीच्या खटल्याविरोधातील याचिका, तसेच या वर्षी फेब्रुवारीमध्ये लखनऊमधील खासदार-आमदार न्यायालयाने बजावलेली समन्सची नोटीस फेटाळली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी म्हटले होते की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्याही व्यक्तीला भारतीय लष्कराची बदनामी होईल असे काहीही बोलण्याचा अधिकार देत नाही.
बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे (BRO) माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी ही मानहानीची तक्रार दाखल केली आहे आणि सध्या ती लखनऊ न्यायालयात सुरू आहे. तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, काँग्रेस नेत्याने भारत जोडो यात्रेदरम्यान 16 डिसेंबर 2022 रोजी कथितरित्या अपमानास्पद विधाने केली.
9 डिसेंबर रोजी भारतीय लष्कर आणि चिनी PLA च्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबद्दल राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधाने केली, ज्यामुळे भारतीय लष्कराची बदनामी झाली, असा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी लष्कर भारतीय सैनिकांना “मारहाण” करत आहे, असे अपमानास्पद पद्धतीने वारंवार म्हटले, असे तक्रारदाराने सांगितले.
भाजपची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणांनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आणि म्हटले, चिनींनी भारतीय हद्दीवर कब्जा केल्याच्या बेजबाबदार दाव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले! सर्वोच्च न्यायालय: 2000 चौरस किमी भारतीय हद्दीवर चिनींनी कब्जा केल्याचे तुम्हाला कसे कळले? एक खरा भारतीय हे बोलणार नाही.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या अशा कठोर टिप्पणीनंतर आणि कानउघडणीनंतर राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी ट्विट केले.
भाजप नेते अमित मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या ताज्या फटकारण्यावरून राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आणि म्हटले की, त्यांची विधाने भारताच्या प्रादेशिक अखंडतेच्या विरोधात आहेत.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडतेशी संबंधित बेजबाबदार विधाने केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ‘चायना गुरु’ राहुल गांधी यांना फटकारले आहे. कल्पना करा, एका विरोधी पक्षनेत्याला अशा बेदरकारपणे बोलल्याबद्दल वारंवार फटकारले जात आहे. त्यांची अलीकडील ‘मृत अर्थव्यवस्था’ ही टिप्पणी याच मालिकेतील नवीनतम आहे. असे करताना त्यांनी एका दीर्घकाळच्या मित्र देशाची (रशियाची) अर्थव्यवस्था संघर्ष करत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले, तर दुसरीकडे पाकिस्तानसारख्या शत्रु राष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे विचित्रपणे समर्थन केले. अनेक पातळ्यांवर हा एक राजनैतिक आपत्तीचा प्रकार आहे, असे त्यांनी ट्विट केले.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Rahul Gandhi: "खरे भारतीय असता तर हे बोलला नसता”; राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement