'जय हिंद',‘भारत माता की जय’ उर भरून येणारे हे नारे कोणी दिले? कोण होत्या त्या दोन व्यक्ती!

Last Updated:

Jai Hind and Bharat Mata ki Jai: 'जय हिंद' आणि ‘भारत माता की जय’ दिल्यानंतर मनात काय भावना येते हे सांगण्याची गरज नाही. मात्र तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का अभिमानाने उर भरून येणारे हे नारे कोणी दिले?

News18
News18
भारतीय सैन्य दल, निमलष्करी दल आणि पोलीस दलांमध्ये ‘जय हिंद’ चा नारा सर्रास वापरला जातो. कनिष्ठ कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभिवादन करण्यासाठी सामान्यतः ‘जय हिंद’ चाच उपयोग करतात. पण सैन्य आणि पोलीस दलांनी हा नारा कसा स्वीकारला. यामागे एक अतिशय मनोरंजक कथा आहे. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की ही घोषणा आझाद हिंद फौजचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती. पण हे सत्य नाही. हा नारा सर्वात पहिल्यांदा एका मुस्लिम व्यक्तीने दिला होता. याचप्रमाणे आणखी एक नारा आहे जो आपल्या सर्वांमध्ये जोश भरतो, तो म्हणजे ‘भारत माता की जय.’ ही घोषणासुद्धा एका मुस्लिम व्यक्तीनेच दिली आहे.
'जय हिंद' चा नारा एका हैदराबादी युवकाने दिला
हैदराबादवर लिहिलेल्या एका पुस्तकातून खुलासा झाला आहे की, हा नारा एका हैदराबादी युवकाने दिला होता. माजी प्रशासकीय अधिकारी आणि स्तंभलेखक नरेंद्र लूथर यांनी त्यांच्या ‘लेंगेंडोट्स ऑफ हैदराबाद’ या पुस्तकात हैदराबादबद्दल अनेक मनोरंजक खुलासे केले आहेत. यापैकी एक अत्यंत खास माहिती त्यांनी हैदराबादचे युवक जैन-उल-आबिद हसन ‘सफरानी’ यांच्याबद्दल दिली आहे. आबिद हसन पुढे जाऊन एक राजनैतिक अधिकारी बनले.
advertisement
जर्मनीमध्ये बोस यांची भेट
या पुस्तकानुसार दुसऱ्या महायुद्धादरम्यान सुभाषचंद्र बोस हिटलरला भेटण्यासाठी जर्मनीला गेले होते. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात हिटलरची मदत घेऊ इच्छित होते. याच दरम्यान सुभाषचंद्र बोस यांना जर्मनीमध्ये राहणाऱ्या काही भारतीयांच्या एका सभेला संबोधित करण्याची संधी मिळाली. याच सभेत आबिद हसन यांची सुभाषचंद्र बोस यांच्याशी भेट झाली. हैदराबादचे रहिवासी असलेले आबिद त्यावेळी जर्मनीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीनंतर ते देशसेवेसाठी प्रेरित झाले. सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर देशात परत येऊन आपल्या सैन्यात सामील होण्यास सांगितले.
advertisement
आबिद हसन यांनी शिक्षण सोडले
‘लेंगेंडोट्स ऑफ हैदराबाद’ नुसार, आबिद हसन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापासून इतके प्रेरित झाले की त्यांनी जर्मनीतील आपले अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडले. ते सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या मिशनमध्ये सामील झाले. नेताजींनी त्यांना आपले सचिव बनवले. यासोबतच ते नेताजींसाठी दुभाषीचे कामही करू लागले. पुस्तकानुसार नेताजींनी आबिद हसन यांना आझाद हिंद फौजेत (INA) मेजरचे पद दिले. इतकेच नव्हे, तर आबिद हसन ब्रह्मदेशात (आता म्यानमार) झालेल्या एका लढाईत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सहभागी झाले.
advertisement
बोस यांना नारामध्ये ‘हिंदुस्तान’ हवा होता
आझाद हिंद फौजेत सामील होताच आबिद हसन नेताजींच्या खूप जवळचे झाले. त्यावेळी नेताजींना एक असा नारा हवा होता, ज्यामध्ये हिंदुस्तानी असण्याचा बोध होईल. जो उच्चारल्यावर संपूर्ण हिंदुस्तानचा भाव येईल. पुस्तकानुसार, त्यावेळी हिंदू लोकांमध्ये आपापसात ‘राम राम’, मुस्लिमांमध्ये ‘सलाम वालेकुम’ आणि पंजाब्यांमध्ये ‘सत श्री अकाल’ असे संबोधन होते. तेव्हा आबिद हसन यांनी नेताजींना ‘हेलो’ सुचवले. पण ते नेताजींना पटले नाही. तेव्हा आबिद हसन यांनी नेताजींना नारा दिला- ‘जय हिंद’. हा नारा नेताजींना आवडला. त्यानंतर तो सर्वांनी स्वीकारला. इतकेच नव्हे, तर राजकीय पक्षांनीसुद्धा तो स्वीकारला. आबिद हसन यांनी दिलेला हा नारा सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या आझाद हिंद फौजेला दिला आणि आपल्या सर्व भाषणांमध्ये त्याचा उपयोग केला.
advertisement
स्वातंत्र्याच्या वेळी नेहरू म्हणाले होते ‘जय हिंद’
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा करताना पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘जय हिंद’ म्हटले होते. तेव्हापासून हा भारतीय सैन्यासाठी सर्वमान्य नारा झाला. अनेक मान्यता असूनही, असे मानले जाते की याला प्रसिद्धी मिळवून देण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची खूप मोठी भूमिका होती. त्यांनीच सर्वात पहिल्यांदा आपल्या आझाद हिंद फौजेला हा नारा स्वीकारण्यास सांगितले. त्यानंतर तो अधिक लोकप्रिय झाला.
advertisement
देश स्वतंत्र झाल्यावर...
आबिद हसन किशोरावस्थेपासूनच देशप्रेमाने ओतप्रोत होते. त्यांनी कमी वयातच महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट देणे सुरू केले होते. त्यावेळी ते महात्मा गांधींपासून खूप प्रभावित होते. पण नंतर आबिद हसन अभियांत्रिकीची पदवी घेण्यासाठी जर्मनीला गेले. त्यानंतर ते स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळात राजनैतिक अधिकारी बनले. आबिद १९६९ मध्ये डेन्मार्कच्या राजदूतपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते हैदराबादला परतले. १९८४ मध्ये ७३ व्या वर्षी आबिद हसन यांचे निधन झाले.
advertisement
‘भारत माता की जय’ चा नारा कुठून आला?
‘भारत माता की जय’ चा नारा अजीमुल्ला खान नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने दिला होता. असे सांगितले जाते की ‘भारत माता की जय’ हा नारा खरं तर उर्दूमध्ये दिलेल्या ‘मादरेवतन हिंदोस्तान झिंदाबाद’ या नाऱ्याचेच हिंदी रूपांतरण आहे. हा नारा १८७३ मध्ये अजीमुल्ला खान यांनी दिला होता, ज्याचे हिंदी रूपांतरण ‘भारत माता की जय’ असे झाले.
आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती आणि १८५७ च्या क्रांतीचे सूत्रधार अजीमुल्ला खान यांनी राष्ट्र रक्षणासाठी एकत्र काम केले होते. देशभक्तीचा समानार्थी शब्द मानला जाणारा हा नारा राष्ट्रगीताशिवाय अपूर्ण मानला जातो. हा नारा सर्वात पहिल्यांदा किरण चंद्र बंदोपाध्याय यांनी ‘भारत माता’ नावाच्या एका नाटकादरम्यान वापरला होता. या नाटकाचा पहिला प्रयोग १८७३ मध्ये झाला होता. त्यानंतर स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान हा नारा अधिक लोकप्रिय होत गेला.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
'जय हिंद',‘भारत माता की जय’ उर भरून येणारे हे नारे कोणी दिले? कोण होत्या त्या दोन व्यक्ती!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement