Shocking Crime : पाण्यावरुन महिलेशी बाचाबाची अन् सुरक्षारक्षकासोबत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; डोंबिवलीतील घटना
Last Updated:
Dombivli Crime : डोंबिवली शहरातूल एका सुरक्षारक्षकासोबत घडलेला प्रकार पाहून सर्वजण हादरले आहे. ज्या संपूर्ण घटनेचे कारण फक्त पाणी होते.
डोंबिवली : गावात किंवा शहराच्या काही भागात अजूनही अनेकजण नळावर पाणी भरण्यासाठी जातात कितेकदा तिथं वादही होतात. पण सध्या डोंबिवलीतून समोर आलेले प्रकरण तितकेच धक्कादायक आहे. जिथं नळावरील वादातून एकाची हत्या करण्यात आलेली आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव उमेश वाघ असून तो एक सुरक्षारक्षक होता. मंगळवारी साधारण संध्याकाळची वेळ होती तेव्हा उमेश हा कोपर परिसरातील एका भागात नळावर हातपाय धूत होता. तेव्हाच तिथं असलेली एक महिला उमेशला त्या नळावर हातपाय का धूत होतास आणि पाणी का वाया घालवतोस म्हणून त्याला ओरडली. मग त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
महिलेचा पती तिथं येताच...
महिला आणि उमेश यांच्यात वाद झाल्यानंतर त्यामहिलेचा पती अक्षय जाधव तिथं आला आणि दोघांमध्येही वाद झाला. त्यानंतर उमेश रात्री रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी गेला जो तिथं सुरक्षारक्षकाचे काम करतो. साधारण 11 वाजता अक्षय हा उमेश जवळ पोहचला आणि परत एकदा वाद घालण्यास सुरुवात केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे अक्षयने रागाच्या भरात लोखंडी सळई घेतली आणि उमेशच्या डोक्यात मारली. सळईचा वार इतका जोरदार होता की उमेशचा त्यात मृत्यू झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking Crime : पाण्यावरुन महिलेशी बाचाबाची अन् सुरक्षारक्षकासोबत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; डोंबिवलीतील घटना








