Health Care : मन थकलेलं असताना शरीरही थकतं का ? ताणाचा शरीरावरही परिणाम होतो ? समजून घेऊया आयुर्वेदानुसार मन - शरीराचा संबंध
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
सतत डोकेदुखी, निद्रानाश किंवा वारंवार झोप न येणं, पोट खराब होणं, सतत थकवा आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचीड तसंच हृदयाचे वाढलेले ठोके हे सर्व मानसिक ताण आता शरीरालाही त्रास देत असल्याचं लक्षण आहे.
मुंबई : आयुष्यात वेगवेगळ्या कारणांमुळे ताण जाणवतो. तब्येतीची चिंता, कामाचा ताण, आर्थिक ताण, नात्यांमधे कटुता, भविष्याची चिंता आणि स्वतःला चांगलं सिद्ध करण्याची स्पर्धा या सगळ्याचा विचार करुन मन थकून जातं.
आपलं मन थकतं तेव्हा सुरुवातीला, ही केवळ मानसिक समस्या वाटली तरी याचे परिणाम जाणवतात. थोडी विश्रांती घेतली तर ताण कमी होईल असं वाटतं. पण हा ताण बराच काळ टिकतो तेव्हा त्याचा परिणाम मनावरच मर्यादित राहत नाही; शरीर देखील त्याचा भार सहन करू लागतं.
advertisement
सतत डोकेदुखी, निद्रानाश किंवा वारंवार झोप न येणं, पोट खराब होणं, सतत थकवा आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचीड तसंच हृदयाचे ठोके वाढणं हे सर्व मानसिक ताण आता शरीरालाही त्रास देत असल्याचं लक्षण आहे.
मन आणि शरीर यांच्यातील संबंधांबद्दल आयुर्वेदात काय म्हटलंय -
आयुर्वेदानुसार, मन आणि शरीर हे वेगळे घटक नाहीत. ते एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. जेव्हा मन असंतुलित होतं तेव्हा शरीराचे तीन दोष - वात, पित्त आणि कफ - देखील बिघडतात.
advertisement
सततची चिंता, भीती आणि चिंता यामुळे वात दोष वाढतो. ज्यामुळे चिंता, निद्रानाश, गॅस आणि सांधेदुखी होते.
राग, ताण आणि मत्सरामुळे पित्त दोष वाढतो. यामुळे आम्लपित्त, उच्च रक्तदाब, डोकेदुखी आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात.
दुःख, आळस आणि निराशेमुळे कफ दोष वाढतो. यामुळे वजन वाढणं, आळस येणं आणि पचनक्रिया बिघडणं यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणूनच, आयुर्वेदात उपचार शरीरापासून नाही तर मन शांत करण्यापासून सुरू होतात.
advertisement
आयुर्वेद प्रथम तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारण्यावर भर देतो. सकाळी लवकर उठून सूर्यप्रकाशात थोडं फिरल्यानं सकारात्मक मन विकसित होण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात पाच-दहा मिनिटं दीर्घ श्वसन किंवा ध्यानानं केल्यानं ताण कमी होऊ शकतो. दररोज दहा-पंधरा मिनिटं तीळ किंवा नारळाच्या तेलानं डोकं आणि पायांचा मसाज केल्यानं मज्जासंस्था शांत होते.
advertisement
अन्नाचा मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. जास्त मसालेदार, तळलेलं आणि कॅफिनयुक्त पदार्थांमुळे ताण वाढू शकतो. त्याऐवजी, डाळी, भाज्या, तूप आणि दूध यासारखे हलके, साधे आणि उबदार पदार्थ खाल्ल्यानं मन शांत करण्यास मदत होऊ शकते.
तुळस आणि गुळवेलीचा चहा प्यायल्यानं तणाव कमी होतोच आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.
तसंच, अनुलोम-विलोम, भ्रामरी आणि शवासन यांसारखे योग आणि प्राणायामामुळे मनाला खोलवर शांती मिळते. यामुळे तणावापासून मुक्त होण्यास मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 6:49 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Care : मन थकलेलं असताना शरीरही थकतं का ? ताणाचा शरीरावरही परिणाम होतो ? समजून घेऊया आयुर्वेदानुसार मन - शरीराचा संबंध








