advertisement

Phobia : Gen Z ला Commitment Phobia आहे का ? अशी भीती का वाटते ? त्यावर कोणते उपाय करता येतील ?

Last Updated:

आजची पिढी भावनिकदृष्ट्या प्रभावित होण्याऐवजी अधिक व्यावहारिक बनली आहे. यामागे अनेक महत्त्वाची कारणं आहेत. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, करिअर घडवण्याचा प्रचंड दबाव, आर्थिक अस्थिरता आणि नातेसंबंधांमधे असुरक्षिततेची वाढती भावना यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. म्हणूनच ते कोणत्याही नात्यात प्रवेश करण्यापूर्वी खोलवर विचार करतात असं तज्ज्ञांनी म्हटलंय.

News18
News18
मुंबई : कुठलंही नातं म्हणजे विश्वास, वचनबद्धता आणि बांधिलकी. हे शब्द खऱ्या आयुष्यात खूप जबाबदारीचे ठरतात कारण ते निभावायचे असतात. विशेषत: लग्न म्हणजे, दोन व्यक्तींचं आयुष्यभरासाठीचं नातं.
आयुष्यभरासाठीचं नातं किंवा मुळात लग्न या विषयावर आजच्या नवीन पिढीचा, 'जनरेशन झेड'चा प्रेमावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. यावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. पवित्रा शंकर यांनी, हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे असं म्हटलंय. त्यांनी यात तरुणाईचं म्हणणं मांडलंय. या पिढीनं प्रेमाकडे पाठ फिरवली नाही, उलट, नातेसंबंधांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.
advertisement
आजची पिढी भावनिकदृष्ट्या प्रभावित होण्याऐवजी अधिक व्यावहारिक बनली आहे. यामागे अनेक महत्त्वाची कारणं आहेत. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, करिअर घडवण्याचा प्रचंड दबाव, आर्थिक अस्थिरता आणि नातेसंबंधांमधे असुरक्षिततेची वाढती भावना यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. म्हणूनच ते कोणत्याही नात्यात प्रवेश करण्यापूर्वी खोलवर विचार करतात असं तज्ज्ञांनी म्हटलंय.
advertisement
जनरेशन झेड लग्न म्हणजे केवळ एक सामाजिक बंधन मानत नाही. त्यांच्यासाठी, जोडीदारासोबत मानसिक आणि भावनिक सुसंगतता ही सर्वात महत्त्वाची आहे. आजचे तरुण लग्नासारखे मोठे निर्णय पुढे ढकलत आहेत कारण त्यांना स्वतःला आधी समजून घ्यायचं आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात आणि करिअरमधे पूर्ण स्थिरता हवी आहे.
कटू अनुभव आणि वचनबद्धतेची भीती - याव्यतिरिक्त, वारंवार ब्रेकअप आणि विषारी नात्यांमधील कटू अनुभवांमुळे या पिढीमधे वचनबद्धतेबद्दल म्हणजेच commitment बद्दल खोलवर भीती निर्माण झाली आहे. ही भीती त्यांना वचनबद्ध होण्यापासून दूर नेते.
advertisement
मजबूत नात्याचा मंत्र - भीती आणि गोंधळानंतरही, मजबूत नातेसंबंध निर्माण करता येतात. हे साध्य करण्यासाठी, काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद, भावनिक परिपक्वता आणि एकमेकांकडून वास्तववादी अपेक्षा असणं. यशस्वी आणि मजबूत नात्याची ही गुरुकिल्ली आहे असा विश्वास डॉ. पवित्रा शंकर यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Phobia : Gen Z ला Commitment Phobia आहे का ? अशी भीती का वाटते ? त्यावर कोणते उपाय करता येतील ?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement