अजितदादांचा सरकारलाच घरचा आहेर, हिंदी सक्तीवर मोठे वक्तव्य

Last Updated:

Three Language Formula: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचे धोरण मागे घेण्यात यावे यासाठी राजकीय पक्ष, साहित्यिक तसेच पालकांनीही थेट भूमिका घेतली.

अजित पवार (उपमुख्यमंत्री)
अजित पवार (उपमुख्यमंत्री)
मुंबई : राज्यातील सर्वच स्तरातून हिंदी सक्तीला वाढता विरोध होत असताना राज्य शासनाने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर आज मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याही एक पाऊल पुढे टाकून 'चौथीपर्यंत हिंदी असू नये', असे स्पष्ट मत व्यक्त करीत राज्य शासन हिंदीची सक्ती मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले.
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचे धोरण मागे घेण्यात यावे यासाठी राजकीय पक्ष, साहित्यिक तसेच पालकांनीही थेट भूमिका घेतली. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालवून घेणार नाही, असा ठाम पवित्रा शिवसेना, मनसे, काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतल्यानंतर सत्ताधारी काहीसे बॅकफूटला गेले. हिंदीला सर्वच स्तरातून विरोध होऊ लागल्यानंतर सांगोपांग चर्चेनंतरच निर्णय घेऊ असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यानंतर आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चौथीपर्यंत हिंदी नकोच, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
advertisement

हिंदीसक्तीवर अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

अजित पवार म्हणाले, मला असे वाटते पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथीपर्यंत हिंदी असू नये. ५ व्या वर्गापासून हिंदी भाषा असावी. अनेक तज्ज्ञांचे हे म्हणणे आहे. कोणत्याही भाषेला विरोध नाही. त्या दोन्ही भाषा लोकांना येतात. लिहिता वाचता येते, कारण त्या सारख्या आहेत. पण बोलायला पाचवीपासून शिकवली जावी. सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमात शिकवावी.
advertisement

हिंदीसक्तीवर तज्ज्ञांचे मत काय आहे?

एकाच वेळी दोन भाषा शिकताना मुलांचे बौद्धिक नुकसान होते. पहिलीमध्येच दोन किंवा तीन भाषा शिकणाऱ्या मुलांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून असावे. पाचवीनंतर इतर भाषा शिकणे सोपे जाते. शिवाय प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झाले तर इतर विषयांचे आकलन करणे सोपे होते, हे शिक्षण तज्ज्ञांचे मत लक्षात घेऊन पहिली ते चौथी हिंदी भाषा सक्ती असू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचा सरकारलाच घरचा आहेर, हिंदी सक्तीवर मोठे वक्तव्य
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement