advertisement

दोन मतदारसंघातल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थोरातांची शंका, खताळांनी सुनावले

Last Updated:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी केल्याच्या आरोपावर आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार केला आहे.

बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ
बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ
अहिल्यानगर : केंद्रीय निवडणूक आयोगाशी संगनमत करून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच आयोग आणि भाजप मिळून निवडणूक प्रक्रिया नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर देशभरातली काँग्रेस नेते चार्ज झाले असून आपापल्या मतदारसंघातील मतदान प्रक्रिया आणि यंत्रणेवर ते बोट ठेवत आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपावर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार पलटवार केला आहे. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढून तुमचा पराभव झाकला जाणार नाही. चाळीस वर्ष निवडून आलात तेव्हा लोकशाही होती का? असा सवाल खताळ यांनी विचारला आहे.
advertisement

दोन मतदारसंघातल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर बाळासाहेब थोरातांची शंका

राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही शिर्डी आणि संगमनेर मतदारसंघात निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केल्यानंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांना ऐकवले.

थोरातांनी वैफल्यातून आरोप केले, आरोपात कुठलेही तथ्य नाही

advertisement
बाळासाहेब थोरात यांचे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप असून त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य दिसत नाही. केवळ आपल्या कार्यकर्त्यांना अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी केलेला त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका आमदार अमोल खताळ यांनी थोरात यांच्यावर केलीय.

तुम्ही ४० वर्ष निवडून आला, तेव्हा लोकशाही होती मग आता...

बाळासाहेब थोरात यांचे आरोप हास्यास्पद असून ४० वर्ष तुम्ही निवडून आलात तेव्हा तुम्हाला लोकशाही जाणवली. आता पराभव झाला तर तो मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे. आयोगावर ताशेरे ओढून तुमचा झालेला पराभव झाकला जाणार नाही, अशा शब्दात अमोल खताळ यांनी थोरात यांना ऐकवले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन मतदारसंघातल्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थोरातांची शंका, खताळांनी सुनावले
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement