Maharashtra Election : राहुल गांधींना अर्बन नक्षलींनी घेरलंय, संविधानाच्या कॉपीवरून फडणवीसांचा हल्लाबोल
- Published by:Suraj
Last Updated:
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
मुंबई : राज्यात गेल्या पाच वर्षात झालेली राजकीय उलथापालथ आणि बदललेल्या राजकीय समीकरणानंतर होत असलेली विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यासह देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलंय. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला फटका बसला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विधानसभा निवडणुकीत आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केलाय. तसंच फडणवीस यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय.
नागपूरमध्ये काँग्रेसच्या संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना बंदी घालण्यात आली. याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी आता काँग्रेसी राहिले नाहीत. ते कम्युनिस्ट ते आता कट्टरपंथी विचारधारेकडे वळले आहेत. ओरिजनल निळ्या रंगा ऐवजी ते लाल रंगाचं कव्हर असलेली संविधानाची प्रत दाखवत असतात.
अराजक पसरवणाऱ्या आणि बंदी असलेल्या नक्षलवाद्यांच्या गराड्यात ते असतात. त्यांची धोरणं ठरवतात आणि नरेटिव्ह सेट करतात.
advertisement
भारत जोडो सुरू केलं होतं तेव्हा चांगली योजना आहे वाटलं होतं. किमान भारत त्यांच्या अजेंड्यावर आहे. पण १८० अशा संघटनांनी त्यात भाग घेतला होता ज्यामध्ये अराजकता पसरवणारे होते. हे रेकॉर्डवर आहे. राहुल गांधींनी एका हातात संविधान धरलंय तर त्यांचं काम मात्र अराजकता पसरवणारं आहे असंही फडणवीस म्हणाले.
नागपूरमध्ये संविधान बचाओ कार्यक्रमात माध्यमांना प्रवेश नसल्याच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, लोकशाही वाचवायची असं बोलतात पण लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या माध्यमांना संविधानावर होणाऱ्या बैठकीपासून दूर ठेवतात. त्यांचा खोटा मुखवटा निसटत असून खरा चेहरा दिसत आहे.
advertisement
राहुल गांधी आणि नाना पटोले भाजपचंच काम करतायत
view commentsसंविधानाला धोका असल्याच्या त्यांच्या नरेटिव्हचा आम्हाला पर्दाफाश करावा लागला नाही. आरक्षण संपवण्याची मागणी करून आणि अमेरिकेत खोटं बोलून राहुल गांधींनी भाजपचंच काम केलं. तर राज्यात नाना पटोले त्यांचीच री ओढत आहेत. दोघेही अजाणतेपणे भाजपच काम करतायत असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 06, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election : राहुल गांधींना अर्बन नक्षलींनी घेरलंय, संविधानाच्या कॉपीवरून फडणवीसांचा हल्लाबोल










