एकदाच करा लागवड नंतर घरी चालत येईल पैसा, या शेतीचं असं करा नियोजन

Last Updated:

अल्पभूधारक शेतकरी कमी पाण्यातही लखपती होऊ शकतात. पाहा कोणतं पीक ठरेल फायद्याचं...

+
एकदाच

एकदाच करा लागवड नंतर घरी चालत येईल पैसा, या शेतीचं असं करा नियोजन

उन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी
उन्हाळा जवळ आला की लिंबाची आठवण सर्वांनाच होते. परंतु, अलीकडे सर्वच ऋतूत लिंबाला विशेष मागणी असते. ऐन उन्हाळ्यात लिंबाला मोठा दर मिळतो. तसेच लिंबाच्या शेतीसाठी पाणीही कमीच लागते. त्यामुळे लिंबाची शेती करून शेतकरी लखपती झाल्याची उदाहरणे आपण पाहिलीच असतील. मात्र, कोणतीही शेती करण्यापूर्वी त्याचा योग्य अभ्यास करणे आणि माहिती घेणे गरजेचे असते. तसेच आपणही लिंबाच्या शेतीचा विचार करत असाल तर कृषी अभ्यासक चांडक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
लिंबाची लागवड तंत्रज्ञान
लिंबाची लागवड ही मोसंबीच्या लागवडीप्रमाणेच 20 × 20 अंतरावर करावी. लिंबाची पेरणीही करता येते. लिंबाची रोपेही लावता येतात. लिंबू लागवडीसाठी दोन्ही पद्धतींनी पेरणी करता येते. रोपे लावून लिंबाची लागवड जलद आणि चांगली होते आणि त्यासाठी कमी मेहनतही लागते, तर बिया पेरून पेरणी करताना जास्त वेळ आणि मेहनत लागते. लिंबू रोपांचे प्रत्यारोपण करण्यासाठी, आपण त्याची रोपे नर्सरीमधून खरेदी करावी.
advertisement
लिंबाच्या लागवडीसाठी जमीन
लिंबाच्या लागवडीसाठी मुरमाड आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन सर्वोत्तम मानली जाते. ज्या जमिनीत पाणी साचून राहण्याचा धोका असतो, अशा जमिनीवर लिंबाची लागवड करू नये. हलक्या आम्लयुक्त आणि क्षारयुक्त जमिनीतदेखील लिंबाची लागवड करता येते. लिंबाला सर्व प्रकारचं हवामान पोषक ठरतं, हे या पिकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
advertisement
लिंबाच्या किती आहेत जाती?
लिंबाच्या अनेक जाती आहेत, ज्यांचा वापर बहुधा प्रायः प्रकंदच्या कामात केला जातो. उदाहरणार्थ फ्लोरिडा रफ, कर्ण किंवा आंबट चुना, जांबिरी आदी. कागी चुना, कागजी कलान, गलगल आणि लाइम सिलहट या जाती बहुतेक घरगुती वापरासाठी वापरल्या जातात. यापैकी कागदी लिंबू सर्वात लोकप्रिय आहेत.
advertisement
लिंबाच्या शेतीसाठी सिंचन
लिंबाच्या झाडांना जास्त सिंचनाची गरज नसते. कारण लिंबाची लागवड किंवा पेरणी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत केली जाते. तुम्ही पावसाळ्याच्या आधी जर पेरणी केली तर या काळात जास्त सिंचनाची गरज भासत नाही. पावसाळ्यात पाऊस नसल्यास 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे, परंतु, हे पाणी हलके असावे जेणेकरून जमिनीतील ओलावा 6-8% राहील, असे चांडक सांगतात.
मराठी बातम्या/कृषी/
एकदाच करा लागवड नंतर घरी चालत येईल पैसा, या शेतीचं असं करा नियोजन
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement