advertisement

बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? ओपिनियन पोलने दिले उत्तर; राज्यात भाजपला किती जागा मिळणार, आकडे पाहून दिल्लीत घडामोडींना वेग

Last Updated:

West Bengal Opinion Poll: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMC सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तर भाजपने यावेळी काही करून सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.

News18
News18
कोलकाता: निवडणूक आयोगाने काल रविवारी पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. ज्या पाच राज्यात निवडणुका होणार आहेत त्यापैकी सर्वाधिक चर्चेत आणि लक्ष असलेले राज्य म्हणजे पश्चिम बंगाल होय. राज्यात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे. बंगालमध्ये दोन टप्प्यात म्हणजे 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निकाल 4 मे रोजी लागणार आहे. अशात एका ओपिनियन पोलने सर्वांना धक्का दिला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील TMCला विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता असल्याचा अंदाज एका ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात बळकट होत असलेल्या भाजपकडून सत्ताधारी पक्षाला कडवी टक्कर मिळू शकते, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
IANS आणि Matrize यांनी संयुक्तपणे केलेल्या या ओपिनियन पोलचा अहवाल निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केलेल्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार 294 सदस्यांच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेसला 155 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे दिसून येते.
advertisement
दुसरीकडे भाजपही फार मागे नसून या निवडणुकीत पक्षाला 100 ते 115 जागा मिळू शकतात, असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. या आकड्यांवरून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला विजय मिळण्याची शक्यता दिसत असली तरी निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
या सर्वेक्षणानुसार तृणमूल काँग्रेसला राज्यात 43 ते 45 टक्के मतांची साथ मिळू शकते, तर भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला 41 ते 43 टक्के मतांचा वाटा मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement
2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 215 जागा जिंकत राज्यात भक्कम बहुमत मिळवले होते. त्या वेळी भाजपने जोरदार प्रचार मोहीम राबवली होती आणि पक्षाला 77 जागांवर विजय मिळाला होता. मात्र 2016 च्या निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे 2021 मधील निकाल हा पक्षासाठी मोठी प्रगती मानली गेली होती.
advertisement
2011 मध्ये डाव्या पक्षांची सत्ता उलथवून लावल्यानंतर ममता बॅनर्जी सातत्याने राज्यावर सत्ता गाजवत आहेत आणि आता त्या सलग चौथ्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत राज्यात आपले अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या भाजपकडून त्यांना कडवे आव्हान मिळत आहे. भाजपचे लक्ष्य तृणमूल काँग्रेस सरकारला सत्तेतून हटवणे हे आहे.
दरम्यान काँग्रेस आणि माकप हे पक्षही या निवडणुकीत मैदानात आहेत. 2021 च्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नव्हती, मात्र यावेळी आपली राजकीय उपस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि जागांची संख्या वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
बंगालमध्ये 'कमळ' फुलणार? ओपिनियन पोलने दिले उत्तर; राज्यात भाजपला किती जागा मिळणार, आकडे पाहून दिल्लीत घडामोडींना वेग
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement