Success Story : नोकरी सोडली अन् घेतला व्यवसाय करण्याचा निर्णय, सेंद्रिय गूळ विक्रीतून वर्षाला 8 लाख नफा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
अण्णासाहेब मोरे यांची ही कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यांनी नोकरीच्या सुरक्षिततेपेक्षा व्यवसायातील स्वावलंबनाला प्राधान्य दिले आणि त्यातून यश मिळवले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सेंद्रिय गूळ हा आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अण्णासाहेब मोरे यांनी या संधीचा फायदा घेतला आणि गूळ उत्पादनासाठी योग्य तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यांनी पारंपरिक पद्धतीने गूळ तयार करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यामुळे त्यांचा गूळ चविष्ट आणि गुणवत्तेत उच्च राहू लागला. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला आणि आज ते स्थिर उत्पादन आणि विक्री करत आहेत.
advertisement
आज त्यांच्या व्यवसायाची स्थिती पाहता ते किरकोळ स्वरूपात गूळ विक्री करत असले तरी त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि चव यामुळे ग्राहकांची पसंती मिळते. स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या गुळाची मोठी मागणी आहे. त्यांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण करण्यावर भर दिला आहे. भविष्यात आपल्या व्यवसायाला आणखी मोठ्या स्तरावर नेण्याचा त्यांचा मानस आहे.
advertisement
नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला हा विचार त्यांनी मनाशी पक्का केला आणि त्यानुसार मेहनत घेतली. त्यांचा व्यवसाय आज यशस्वी झाला असून त्यांना या उद्योगातून वर्षाला 8 लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. कमी वेळात आणि मोठ्या जिद्दीने त्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची ही कहाणी नव्या पिढीतील उद्योजकांसाठी एक उत्तम उदाहरण ठरू शकते.