Success Story : शिक्षण घेतांनी शेतीकडे लक्ष, गोविंदने केली गुलाब लागवड, वर्षाला 7 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षण आणि शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत गोविंद यांनी गुलाब लागवडीचा प्रयोग सुरू केला.
बीड जिल्ह्यातील टालेवाडी या छोट्याशा गावातील गोविंद चव्हाण हे युवक आज तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आणि आधुनिक शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शिक्षण आणि शेती या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत गोविंद यांनी गुलाब लागवडीचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला त्यांनी केवळ अर्ध्या एकर क्षेत्रात गुलाब लागवड केली, मात्र पहिल्याच वर्षी त्यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी या शेतीचा विस्तार करत एक एकर क्षेत्रात गुलाब उत्पादन सुरू केले.
advertisement
advertisement
advertisement
गेल्या दोन वर्षांपासून गोविंद सातत्याने गुलाब शेतीतून भरघोस उत्पन्न घेत आहेत. स्थानिक बाजारपेठेबरोबरच आसपासच्या शहरांमधून देखील व्यापारी त्यांच्या गुलाबांची मागणी करतात. मंदिरे, हॉटेल, पूजाविधी, तसेच लग्नसमारंभ यांसाठी गुलाबांची मोठी खप आहे. या मागणीमुळे त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळतो. परिणामी, त्यांना वर्षाकाठी सहा ते सात लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, जो पारंपरिक पिकांच्या तुलनेत दुपटीने अधिक आहे.
advertisement
गोविंद चव्हाण यांनी शेतीमध्ये नियोजनबद्धता आणि बाजारपेठेचे ज्ञान या दोन गोष्टींवर विशेष भर दिला आहे. गुलाब लागवड करताना योग्य जातींची निवड, वेळेवर छाटणी, सिंचन आणि खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा त्यांनी काटेकोर अभ्यास केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि दूरदृष्टीमुळे त्यांची गुलाब शेती आज परिसरात आदर्श मानली जाते.
advertisement
advertisement


