Farmer Success Story: नववी पास शेतकरी झाला करोडपती, शेती ठरली फायदाची, असा केला भारी प्रयोग!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
Farmer Success Story: घरची गरिबी आणि छपराच्या घरात राहणाऱ्या या शेतकऱ्याला नववीतून शाळा सोडावी लागली. परंतु, त्यानंतर शेवगा शेतीनं त्यांचं नशीबच पालटलं.
advertisement
advertisement
माढा तालुक्यात सर्वात मोठं उजनी धरण आहे. याच तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे शेतकरी बाळासाहेब पाटील यांचं गाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि घर छपराचं अशी स्थिती असतानाच त्यांना नववीतून शाळा सोडावी लागली. तेव्हा त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ‘धरण उशाला कोरण घशाला’ अशी स्थिती होती. पाणी नसल्याने शेती कोणती करावी, असा प्रश्न त्यांना पडलेला होता. तेव्हा त्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची माहिती घेतली आणि शेवगा शेतीचा पर्याय निवडला. सुरुवातीला एका एकरात त्यांनी शेवगा पिकाची लागवड केली.
advertisement
advertisement
advertisement
बाळासाहेब पाटील यांनी शेवगा शेतीतून मिळालेल्या यशामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तर त्यांच्यावर डॉ. सचिन चंद्रकांत फुगे यांनी ‘शेवग्याच्या झाडातून देशयात्रा’ असे पुस्तक देखील लिहिले आहे. बाळासाहेब यांच्यावर लिहिलेले पुस्तक हे इतर शेतकऱ्यांसाठी देखील फायदेशीर ठरत आहे. या पुस्तकामध्ये शेवगा लागवडीपासून ते येणारा सर्व खर्चापर्यंत माहिती उपलब्ध आहेत.
advertisement