सुपर सिक्रेट! सेंधा मीठासोबत फक्त 250 ग्रॅम हा पदार्थ जनावरांना खायला द्या, दुधात होईल दुप्पट वाढ

Last Updated:
Dairy Farming : डिसेंबर महिना सुरू होताच राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.
1/6
agriculture news
डिसेंबर महिना सुरू होताच राज्यातील अनेक भागांत कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. या थंडीचा परिणाम केवळ माणसांवरच नव्हे तर शेती आणि विशेषतः पशुधनावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. थंड हवामानामुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गायी-म्हशींमध्ये दूध उत्पादन कमी होणे, अन्न पचनात अडचणी येणे व आजारपण वाढणे अशा समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. परिणामी दूध उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र पशुवैद्यांच्या मते, काही सोप्या आणि पारंपरिक उपाययोजना केल्यास हिवाळ्यातही दूध उत्पादन वाढवता येऊ शकते.
advertisement
2/6
agriculture
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, अती थंडीमुळे जनावरांची पचनसंस्था कमकुवत होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे चारा खाल्ला तरी त्यातून पूर्ण पोषण मिळत नाही आणि दूध कमी पडते. ही अडचण दूर करण्यासाठी आहारात काही बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. पशुवैद्य सांगतात की दररोज प्रत्येकी 50 ग्रॅम सैंधव मीठ जनावरांना दिल्यास पचनक्रिया सुधारते. सैंधव मीठामध्ये आवश्यक खनिजे असल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. हिवाळ्यात साधारणतः 3 ते 4 लिटर दूध देणारी जनावरे या उपायामुळे 6 ते 7 लिटरपर्यंत दूध देऊ शकतात, असा अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
advertisement
3/6
agriculture
यासोबतच, जनावरांच्या आहारात दररोज 250 ग्रॅम गूळ घालणेही तितकेच फायदेशीर ठरते. गूळ शरीरात उष्णता निर्माण करतो आणि थंडीत आवश्यक ती ऊर्जा पुरवतो. गूळ आणि खडे मीठ यांचा नियमित वापर केल्यास जनावरे सशक्त राहतात, थंडीमुळे होणारा अशक्तपणा कमी होतो आणि दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. विशेषतः पहाटे आणि रात्री थंडी अधिक जाणवते, त्यामुळे या वेळेस हे पूरक आहार देणे अधिक उपयुक्त ठरते.
advertisement
4/6
agriculture
हिवाळ्यात केवळ आहारावरच नव्हे तर जनावरांच्या राहण्याच्या व्यवस्थेवरही लक्ष देणे गरजेचे आहे. रात्री जनावरांना थंडीपासून वाचवण्यासाठी गोठ्यात शेकोटी पेटवणे किंवा गोठे नीट झाकून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे थंड वारे थेट जनावरांवर लागत नाहीत. उष्ण वातावरणामुळे त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित राहते, पचन सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
advertisement
5/6
agriculture
पशुवैद्य गोठ्याच्या स्वच्छतेवरही भर देतात. गोठ्यात ओलावा, चिखल किंवा साचलेले पाणी असू नये. अशा वातावरणात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते, ज्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर होतो. चारा देताना तो स्वच्छ, कोरडा आणि कुजलेला नसल्याची खात्री करावी. खराब किंवा बुरशी लागलेला चारा थंडीत आजार वाढवू शकतो.
advertisement
6/6
agriculture
एकूणच, हिवाळ्यात शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. सैंधव मीठ, गूळ यांसारखे पारंपरिक उपाय, योग्य निवारा आणि स्वच्छता राखल्यास जनावरे निरोगी राहतील. यामुळे दूध उत्पादन वाढून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. थोडी काळजी आणि योग्य व्यवस्थापन केल्यास कडाक्याच्या थंडीतही पशुपालन फायदेशीर ठरू शकते.
advertisement
Eknath Shinde Devendra Fadnavis: मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?
मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?
  • मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?

  • मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?

  • मोठी बातमी! फडणवीस-शिंदेंमध्ये नागपुरात रात्री बैठक, बंद दाराआड चर्चेत काय झालं?

View All
advertisement