Chandragrahan 2025: शुद्धता जशीच्या तशी! चंद्रग्रहणानंतर रात्री किंवा सकाळी न चुकता करावीत ही 4 कामे
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
After Lunar Eclipse Astro Tips: भारतात धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण नेहमीच विशेष मानले गेले आहे. या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शुभ कामे केली जात नाहीत. ग्रहणाच्या वेळी ज्याप्रमाणे नियमांचे पालन करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे ग्रहणानंतर काही कामे करणे आवश्यक मानले जाते. ग्रहण संपताच पारंपरिकपणे काही विशेष कामे केली जातात. त्यामुळे पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते. तसेच, कुटुंबात काही दोष असतील तर ते देखील संपतात, असे मानले जाते,
advertisement
advertisement
घराची स्वच्छता - ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणानंतर घराचे वातावरण शुद्ध करावे. यासाठी संपूर्ण घर स्वच्छ करा आणि घरातील देव्हाराही पूर्णपणे स्वच्छ करा. शक्य असल्यास पाण्यात मीठ घालून फरशी पुसून टाका. ग्रहण मध्यरात्री संपणार असल्याने संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात मीठ घालून संपूर्ण घर पुसून काढी. यामुळे घरात असलेल्या ग्रहणाची नकारात्मकता दूर होते.
advertisement
दान - चंद्रग्रहणानंतर सकाळी गरीब किंवा गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान केल्याने विशेष पुण्य मिळते. हे ग्रहण रात्री संपणार असल्यानं दुसऱ्या दिवशी दान करा. तीळ, तांदूळ, दूध, मीठ, पांढरे कपडे किंवा चांदी यासारख्या पांढऱ्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते, या सर्व गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत, ज्यामुळे ग्रहण दोष दूर होतो.
advertisement
अन्न खाण्याविषयी - सूतक काळात शिजवलेले अन्न खाणे अशुद्ध मानले जाते, म्हणून ग्रहण काळात ठेवलेले अन्न किंवा पाणी देखील सोडून द्यावे, ते ग्रहणानंतर खाऊ नये. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ग्रहणानंतर मंत्र जप आणि ध्यान केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)