Gaurav More: 'चला हवा येऊ द्या' मध्ये गेला, मग 'हास्यजत्रा'मध्येच का नाही परतला? चाहत्यांच्या प्रश्नांवर अखेर गौरव मोरेने सोडलं मौन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gaurav More: चाहत्यांच्या मनात एकच खदखद होती, "गौरव, जर तुला स्कीटच करायचं होतं, तर मग 'हास्यजत्रे'च्या कुटुंबात का नाही परतलास?" या प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर गौरवने आता अत्यंत रोखठोकपणे यामागचं उत्तर दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
'नाईन माईंड्स क्रिएशन'ला दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने आपल्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने सांगितलं. अनेक प्रेक्षकांना वाटलं की गौरवने एका रात्रीत हा निर्णय घेतला, पण हिशोब मांडताना गौरव म्हणाला, "२०२४ च्या एप्रिलमध्ये मी हिंदी शोसाठी हास्यजत्रा सोडली होती. त्यानंतर २०२५ मध्ये 'चला हवा येऊ द्या' सुरू झालं. या दोन्हीच्या दरम्यान जवळपास ३६५ दिवसांचा काळ गेला. हा काळ माझ्यासाठी बदलाचा होता."
advertisement
advertisement
advertisement







