advertisement

Marathi Serial : 500 एपिसोडही पूर्ण करू शकली नाही; दीड वर्षांतच या मराठी मालिकेने गुंडाळला गाशा

Last Updated:
Marathi Serial End : मालिका सुरू होऊन दीड वर्षेच झाली. 100, 200, 300, 400 अशा एपिसोडचा टप्पा या मालिकेने पूर्ण केलं. पण 500 चा आकडा गाठू शकली नाही. त्याआधीच मालिका बंद करावी लागली.
1/7
गेल्या काही दिवसांत नवीन मालिका आल्या असल्या तरी काही जुन्या मालिकांनी निरोपही घेतला आहे. पारूसारखी मालिका तर शेवटचा एपिसोड प्रसिद्ध न करताच अचानक बंद झाली आणि आता एक अशी मालिका जिने 500 एपिसोडही पूर्ण केले नाहीत आणि या मालिकेने दीड वर्षांतच आपला गाशा गुंडाळला आहे.
गेल्या काही दिवसांत नवीन मालिका आल्या असल्या तरी काही जुन्या मालिकांनी निरोपही घेतला आहे. पारूसारखी मालिका तर शेवटचा एपिसोड प्रसिद्ध न करताच अचानक बंद झाली आणि आता एक अशी मालिका जिने 500 एपिसोडही पूर्ण केले नाहीत आणि या मालिकेने दीड वर्षांतच आपला गाशा गुंडाळला आहे.
advertisement
2/7
2024 मध्ये सुरू झालेली ही मालिका, ज्याला दीड वर्षे झाली. सुरुवातीला ही मालिका सायंकाळी 6.30 च्या स्लॉटला होती, सध्या ती रात्री उशिरा 11 वाजता प्रसारित केली जात होती.
2024 मध्ये सुरू झालेली ही मालिका, ज्याला दीड वर्षे झाली. सुरुवातीला ही मालिका सायंकाळी 6.30 च्या स्लॉटला होती, सध्या ती रात्री उशिरा 11 वाजता प्रसारित केली जात होती.
advertisement
3/7
10 मार्च रोजी या मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या पोस्ट काही दिवसापूर्वीच सोशल मीडियावर आल्या होत्या. मालिकेतील कलाकार आणि मालिकेशी संबंधित अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.  मालिकेतील अभिनेत्रीने शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटोही पोस्ट केले होते.
10 मार्च रोजी या मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झाल्याच्या पोस्ट काही दिवसापूर्वीच सोशल मीडियावर आल्या होत्या. मालिकेतील कलाकार आणि मालिकेशी संबंधित अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.  मालिकेतील अभिनेत्रीने शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचे फोटोही पोस्ट केले होते.
advertisement
4/7
अखेर 22 मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला आणि मालिकेने निरोप घेतल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या.
अखेर 22 मार्च रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड दाखवण्यात आला आणि मालिकेने निरोप घेतल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या.
advertisement
5/7
या मालिकेची निर्मिती सुबोध भावे आणि त्याची पत्नी निर्मिती भावेने केली होती. त्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या पोस्टनुसार या मालिकेचे 400 एपिसोड पूर्ण झाले. 462 वा एपिसोड शेवटचा एपिसोड होता. त्यामुळे मालिका 500 एपिसोडही गाठू शकली नाही.
या मालिकेची निर्मिती सुबोध भावे आणि त्याची पत्नी निर्मिती भावेने केली होती. त्यांनी सोशल मीडियावर दिलेल्या पोस्टनुसार या मालिकेचे 400 एपिसोड पूर्ण झाले. 462 वा एपिसोड शेवटचा एपिसोड होता. त्यामुळे मालिका 500 एपिसोडही गाठू शकली नाही.
advertisement
6/7
या मालिकेत 5 मैत्रिणींची स्टोरी आहे. पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या मैत्रीण एकाच रूममध्ये रूममेट्स म्हणून एकत्र राहतात.  पाच मैत्रिणींच्या आयुष्यातील नाट्यमय घडामोडी, त्यांची स्वप्नं आणि संकटात एकमेकींना देणारा आधार यावर ही मालिका होती.
या मालिकेत 5 मैत्रिणींची स्टोरी आहे. पाच वेगवेगळ्या स्वभावाच्या मैत्रीण एकाच रूममध्ये रूममेट्स म्हणून एकत्र राहतात.  पाच मैत्रिणींच्या आयुष्यातील नाट्यमय घडामोडी, त्यांची स्वप्नं आणि संकटात एकमेकींना देणारा आधार यावर ही मालिका होती.
advertisement
7/7
ही मालिका आहे पिंगा ग पोरी पिंगा. ज्यात ऐश्वर्या शेटे (वल्लरी), विदिशा म्हस्कर (तेजा), आकांक्षा गाडे (श्वेता), शाश्वती पिंपळीकर (प्रेरणा), प्राजक्ता परब (मिथिळा) अशा 5 अभिनेत्रींची भूमिका होती. 
ही मालिका आहे पिंगा ग पोरी पिंगा. ज्यात ऐश्वर्या शेटे (वल्लरी), विदिशा म्हस्कर (तेजा), आकांक्षा गाडे (श्वेता), शाश्वती पिंपळीकर (प्रेरणा), प्राजक्ता परब (मिथिळा) अशा 5 अभिनेत्रींची भूमिका होती. 
advertisement
Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement