...म्हणून नीलम आणि बॉबीचं होता-होता फिसकटलेलं! इतक्या वर्षांनी अभिनेत्रीनं केला खुलासा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Bobby Deol Wanted To Marry Neelam: एक काळ असा होता की बॉबी देओल आणि नीलम कोठारी यांची बॉलिवूड इंडस्ट्रीत खूप चर्चा होती. दोघेही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र होती. पण, अचानक दोघांनी आपलं 5 वर्षांचं नातं संपवलं आणि हे नातं का तुटलं असेल? यावर लोक तर्क लावत राहिले. ज्यावर नीलमने आता कित्येत वर्षांनंतर मौन सोडले आहे.
नीलम कोठारी ही 90 च्या दशकातील सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. नीलमने 1984 मध्ये रिलीज झालेल्या 'जवानी'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटापासून ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली. सगळीकडे फक्त तिचीच जादू होती. या काळात तिचं अनेक अभिनेत्यांशी नाव जोडले गेलं. धर्मेंद्र यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलसोबतही नीलमचे नाव जोडले गेले. दोघेही जवळपास 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण, अचानक बातमी आली की नीलम आणि बॉबीचे ब्रेकअप झाले. त्यावेळी पूजा भट्टमुळे बॉबी आणि नीलम वेगळे झाल्याची कुजबुज सुरू होती. तर काहींनी धर्मेंद्र याचं कारण असल्याचे सांगितले. मात्र, यामागील सत्य काय आहे, हे कोणालाच कळले नाही. आता कित्येक वर्षांनंतर नीलमनेच तिच्या आणि बॉबी देओलच्या ब्रेकअपवर मौन सोडले आहे.
advertisement
90 च्या दशकात बॉबी देओल आणि नीलम कोठारी सुमारे 5 वर्षे सिरीयस रिलेशनशीपमध्ये होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही. 'स्टारडस्ट'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीलमने तिच्या निर्णयामागचे कारण सांगितले आहे. नीलमच्या म्हणण्यानुसार, कोणी तिसर्या व्यक्तीमुळे तिचे आणि बॉबीचे नाते तुटले नाही, तर दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. (छायाचित्र सौजन्य: Instagram: @neelamkotharisoni)
advertisement
नीलम म्हणाली- माझ्यावर विश्वास ठेवा, या निर्णयामागे दुसरं-तिसरं कोणी नव्हतं. मला फक्त एका स्टारची बायको म्हणून माझे करिअर संपवायचे नव्हते. मला त्यावेळी त्या गोष्टीची भीती वाटत होती. त्यावरून मी खूप घाबरले होते. मी त्या भीतीचे वर्णनही करू शकत नाही. त्या निर्णयानंतर ही भीती संपेल, असे वाटले. मी नंतर काहीही चुकीचे होईल याबद्दल विचार करू शकत नाही. त्यामुळे मी थोडा उशिरा निर्णय घेतला. पण नंतर कळले की अजून उशीर झालेला नाही. (छायाचित्र सौजन्य: Instagram: @neelamkotharisoni)
advertisement
बॉबी देओल आणि नीलम कोठारी यांच्यातील नाते संपुष्टात येण्याचे कारणही धर्मेंद्र असल्याचे सांगितले जात होते. बॉबीने नीलमसोबत लग्न करावे असे धर्मेंद्र यांना वाटत नव्हते, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. बॉबीने वडील धर्मेंद्र यांना नीलमबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी बॉबीला नीलमपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बॉबी कधीही त्याच्या वडिलांचा सल्ला मोडत नसे, म्हणून त्याने नीलमपासून अंतर ठेवले आणि त्यांचे लग्न संबंध संपले. (छायाचित्र सौजन्य: Instagram: @neelamkotharisoni)
advertisement
advertisement
बॉबी देओलशिवाय नीलमचे नाव चिची म्हणजेच गोविंदासोबतही जोडले गेले होते. दोघांनी एकत्र डझनहून अधिक चित्रपट केले. या काळात दोघांची कमालीची जवळीक वाढल्याचे बोलले जाते. गोविंदा नीलमवर मनापासून प्रेम करत होता, पण त्यातच गोविंदाचं लग्न झालं. गोविंदाही आईच्या शब्दाबाहेर नव्हता असं सांगितलं जातं, त्यामुळेच तो नीलमपासून दुरावला आणि सुनीतासोबत लग्न केले. (छायाचित्र सौजन्य: Instagram: @neelamkotharisoni)








