Suraj Chavan : जान्हवी आली, पण...! लग्नाच्या 4 महिन्यांनी सूरज चव्हाणने पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan : बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने पहिल्यांदाच त्याच्या लग्नाला न आलेल्यांबद्दल खंत व्यक्त केली. सूरज नेमकं काय म्हणाला?
advertisement
advertisement
advertisement
इतक्या मोठ्या प्रमाणावर निमंत्रण देऊनही प्रत्यक्षात फारच कमी लोकांनी हजेरी लावली. सूरजच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, डीपी दादा आणि पुरुषोत्तम दादा पाटील हेच प्रमुख पाहुणे उपस्थित होते. विशेष म्हणजे 'झापुक झुपूक'चे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही लग्नाला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांमध्येही याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.
advertisement
लग्नानंतर काही काळ शांत राहिल्यानंतर सूरजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. सूरज म्हणाला, "जान्हवी आणि निक्की माझ्या बहिणी आहेत. शेवटपर्यंत माझी बहिण थांबली. कुणी नाही आलं पण जान्हवी आली. निक्कीला काही तरी अडचण होती. तिला शूट होतं म्हणून ती आली नाही. नाहीतर तीपण आली असती. अरबाज आणि ती येणार होते जोडीने."
advertisement
advertisement






