Trisha Krishnan: त्रिशा कृष्णननं कोणत्या कारणामुळे मोडला साखरपुडा; अभिनेत्रीने केला स्वत: खुलासा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच ती टॉलिवूड अभिनेता थलापती विजय याच्यासोबत एका वेडिंग रिसेप्शनमध्ये एकत्र स्पॉट झालेली होती. तेव्हापासून त्यांच्या रिलेशनची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. थलापती विजयच्या पत्नीने त्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत कोर्टामध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. अशातच सध्या सोशल मीडियावर त्रिशाचा पहिला साखरपुडा कोणत्या कारणामुळे तुटला? याची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
advertisement
विजयने डिसेंबर 2025 मध्ये पत्नीसोबतच्या घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. ज्याची माहिती 27 फेब्रुवारी रोजी समोर आली. तेव्हापासूनच त्रिशा आणि विजयच्या रिलेशनची जोरदार चर्चा होत आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या त्रिशाचा पहिला साखरपुडा मोडला आहे. 2015 साली, त्रिशाने प्रसिद्ध बिझनेसमन वरूण मनियनसोबत साखरपुडा केला होता.
advertisement
पण त्यानंतर त्यांचा साखरपुडा फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच त्यांनी एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. कारण, त्रिशा आणि वरूणने साखरपुडा केल्यानंतर त्याने त्रिशाला अभिनयातून एक्झिट घेण्यासाठी सांगितली होती. त्यामुळे तिने त्याच्यासोबतचं लग्न तोडलं. आज अभिनेत्री सिंगल असली तरीही करोडोंची मालकिण आहे.
advertisement
advertisement







