मीठामुळे दरवर्षी 18 लाख लोकांचा मृत्यू? WHO च्या नव्या अहवालाने वाढवली चिंता

Last Updated:
मीठामुळे जगभरात दरवर्षी तब्बल १८ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबतचा अहवाल प्रदर्शित केला आहे.
1/9
एखाद्या पदार्थात मीठ नसेल तर तो पदार्थ आपण खाऊ शकत नाही. कोणत्याही पदार्थात जर मीठ नसेल तर आपण तो पदार्थ खाण्याचा विचारही करू शकत नाही. इतकंच नाही, तर मीठासाठी तर भारतात सत्याग्रहही करण्यात आला होता. मात्र आज हेच मीठ लोकांचा जीव जाण्याचे कारण ठरत आहे.
एखाद्या पदार्थात मीठ नसेल तर तो पदार्थ आपण खाऊ शकत नाही. कोणत्याही पदार्थात जर मीठ नसेल तर आपण तो पदार्थ खाण्याचा विचारही करू शकत नाही. इतकंच नाही, तर मीठासाठी तर भारतात सत्याग्रहही करण्यात आला होता. मात्र आज हेच मीठ लोकांचा जीव जाण्याचे कारण ठरत आहे.
advertisement
2/9
मीठामुळे जगभरात दरवर्षी तब्बल १८ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबतचा अहवाल प्रदर्शित केला आहे.
मीठामुळे जगभरात दरवर्षी तब्बल १८ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबाबतचा अहवाल प्रदर्शित केला आहे.
advertisement
3/9
बीबीसी वर्ल्ड सर्विसने केलेल्या एका स्पेशल प्रोग्राममध्ये मीठ आपल्या शरीरासाठी किती घातक आहे हे सांगण्यात आले आहे. तथापि अनेक रिपोर्ट्समध्ये आपल्या आरोग्यासाठी मिठाची गरजही सांगण्यात आली आहे. अमेरिकेतील रटगर्स युनिव्हर्सिटीचे न्यूट्रिशनल सायन्सेसचे प्रोफेसर पॉल ब्रेस्लिन बीबीसीशी बोलताना म्हणतात, 'मीठ जीवनासाठी आवश्यक आहे.'
बीबीसी वर्ल्ड सर्विसने केलेल्या एका स्पेशल प्रोग्राममध्ये मीठ आपल्या शरीरासाठी किती घातक आहे हे सांगण्यात आले आहे. तथापि अनेक रिपोर्ट्समध्ये आपल्या आरोग्यासाठी मिठाची गरजही सांगण्यात आली आहे. अमेरिकेतील रटगर्स युनिव्हर्सिटीचे न्यूट्रिशनल सायन्सेसचे प्रोफेसर पॉल ब्रेस्लिन बीबीसीशी बोलताना म्हणतात, 'मीठ जीवनासाठी आवश्यक आहे.'
advertisement
4/9
माणसाच्या सक्रिय पेशींसाठी मीठ अतिशय आवश्यक आहे. याशिवाय जर आपण पुरेशा प्रमाणात सोडियमचे सेवन केले नाही तर आपला मृत्यूही होऊ शकतो.
माणसाच्या सक्रिय पेशींसाठी मीठ अतिशय आवश्यक आहे. याशिवाय जर आपण पुरेशा प्रमाणात सोडियमचे सेवन केले नाही तर आपला मृत्यूही होऊ शकतो.
advertisement
5/9
खरं तर, सोडियमच्या कमतरतेमुळे हायपोनेट्रेमिया नावाचा रोग होऊ शकतो, ज्यामुळे गोंधळ, उलट्या, फीट येणे, चिडचिड आणि कोमा यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात.
खरं तर, सोडियमच्या कमतरतेमुळे हायपोनेट्रेमिया नावाचा रोग होऊ शकतो, ज्यामुळे गोंधळ, उलट्या, फीट येणे, चिडचिड आणि कोमा यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात.
advertisement
6/9
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार दररोज 5 ग्रॅम मीठ खाणे आवश्यक आहे. 5 ग्रॅम मीठामध्ये सुमारे 2 ग्रॅम सोडियम असते, जे एका चमचाच्या बरोबरीचे आहे. तथापि, लोक 5 ग्रॅमच्या दुप्पट मीठ वापरतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार दररोज 5 ग्रॅम मीठ खाणे आवश्यक आहे. 5 ग्रॅम मीठामध्ये सुमारे 2 ग्रॅम सोडियम असते, जे एका चमचाच्या बरोबरीचे आहे. तथापि, लोक 5 ग्रॅमच्या दुप्पट मीठ वापरतात.
advertisement
7/9
WHO च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर लोक दररोज सरासरी 11 ग्रॅम मीठ खातात. त्यामुळे हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.
WHO च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर लोक दररोज सरासरी 11 ग्रॅम मीठ खातात. त्यामुळे हृदयविकार, गॅस्ट्रिक कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस, लठ्ठपणा आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.
advertisement
8/9
दरवर्षी मिठामुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल बोलायचं झालं तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार दरवर्षी जगभरात मीठामुळे सुमारे १८.९ लाख लोकांचा मृत्यू होतो. या मृत्यूंमध्ये मीठ थेट भूमिका बजावत नाही. त्याऐवजी, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या रोगांच्या उत्पत्ती आणि प्रगतीमध्ये मीठ भूमिका बजावते.
दरवर्षी मिठामुळे होणाऱ्या मृत्यूंबद्दल बोलायचं झालं तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार दरवर्षी जगभरात मीठामुळे सुमारे १८.९ लाख लोकांचा मृत्यू होतो. या मृत्यूंमध्ये मीठ थेट भूमिका बजावत नाही. त्याऐवजी, लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या रोगांच्या उत्पत्ती आणि प्रगतीमध्ये मीठ भूमिका बजावते.
advertisement
9/9
म्हणूनच आरोग्य तज्ञ नेहमी शिफारस करतात की मीठाचे सेवन कमीत कमी करावे. असा सल्ला लोकांना साखरेबाबतही दिला जातो.
म्हणूनच आरोग्य तज्ञ नेहमी शिफारस करतात की मीठाचे सेवन कमीत कमी करावे. असा सल्ला लोकांना साखरेबाबतही दिला जातो.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement