सतर्क व्हा! पावसाळ्यात पालेभाज्या खरेदी करताना रहा सावध, सडकी भाजी ओळखाल?

Last Updated:
पावसाळ्यात पालक, मेथी, बथुआ, कोथिंबीर, मिंट, अंबाडी आणि सेलाक यांसारख्या पालेभाज्यांमध्ये फंगस, किडे किंवा चिकटपणा निर्माण होतो. अशा भाज्या खाल्ल्यास अन्न...
1/9
 बऱ्याचदा भाजी विक्रेते सडलेल्या किंवा थोड्या खराब झालेल्या भाज्या ताज्या दाखवून विकतात. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या खरेदी करताना प्रत्येक भाजी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात कोणती हिरवी भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते पाहुया...
बऱ्याचदा भाजी विक्रेते सडलेल्या किंवा थोड्या खराब झालेल्या भाज्या ताज्या दाखवून विकतात. त्यामुळे पावसाळ्यात पालेभाज्या खरेदी करताना प्रत्येक भाजी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात कोणती हिरवी भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते पाहुया...
advertisement
2/9
 पालक : पावसाळ्यात पालक लवकर सडू लागतो. कधीकधी त्याच्या पानांवर लहान पांढरे किडे किंवा चिखल जमा होतो. असा पालक संसर्ग पसरवू शकतो. खरेदी करताना, पाने हलकी हिरवी, स्वच्छ आणि ताजी असावीत. जर पाने चिकट झाली असतील किंवा त्यांचा रंग बदलला असेल, तर ती अजिबात खरेदी करू नका.
पालक : पावसाळ्यात पालक लवकर सडू लागतो. कधीकधी त्याच्या पानांवर लहान पांढरे किडे किंवा चिखल जमा होतो. असा पालक संसर्ग पसरवू शकतो. खरेदी करताना, पाने हलकी हिरवी, स्वच्छ आणि ताजी असावीत. जर पाने चिकट झाली असतील किंवा त्यांचा रंग बदलला असेल, तर ती अजिबात खरेदी करू नका.
advertisement
3/9
 मेथी : पावसाळ्यात मेथीच्या पानांमध्ये बुरशी लागण्याचा धोका जास्त असतो. पांढरे किंवा तपकिरी डाग ही त्याची ओळख आहे. अशी मेथी खाल्ल्याने पोट खराब होणे, उलटी आणि जुलाब होऊ शकतात. त्यामुळे फक्त लहान पाने असलेली आणि चांगला वास येणारी सुकी मेथीच खरेदी करा.
मेथी : पावसाळ्यात मेथीच्या पानांमध्ये बुरशी लागण्याचा धोका जास्त असतो. पांढरे किंवा तपकिरी डाग ही त्याची ओळख आहे. अशी मेथी खाल्ल्याने पोट खराब होणे, उलटी आणि जुलाब होऊ शकतात. त्यामुळे फक्त लहान पाने असलेली आणि चांगला वास येणारी सुकी मेथीच खरेदी करा.
advertisement
4/9
 चाकवत : चाकवत पावसाळ्यात लवकर सडतो. जर त्याची पाने खालून काळी किंवा पिवळी दिसत असतील, तर ती आधीच खराब झाली आहेत. ते खरेदी करताना बोटानी पाने कुस्करून बघा, जर खराब वास येत असेल किंवा पाने तुटण्याऐवजी कुस्करली जात असतील, तर अशी भाजी खरेदी करू नका.
चाकवत : चाकवत पावसाळ्यात लवकर सडतो. जर त्याची पाने खालून काळी किंवा पिवळी दिसत असतील, तर ती आधीच खराब झाली आहेत. ते खरेदी करताना बोटानी पाने कुस्करून बघा, जर खराब वास येत असेल किंवा पाने तुटण्याऐवजी कुस्करली जात असतील, तर अशी भाजी खरेदी करू नका.
advertisement
5/9
 माठ (अमरंथ) : पावसाळ्यात माठाची पाने खूप नाजूक होतात आणि अनेकदा त्यावर काळे किडे किंवा पानांना छिद्रे पडलेली दिसतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही माठ खरेदी कराल, तेव्हा पूर्ण जुडी उलटी करून तपासा. ताज्या माठाची पाने हलक्या लाल किंवा हिरव्या रंगाची, गुळगुळीत आणि कोणत्याही डागाशिवाय असावीत.
माठ (अमरंथ) : पावसाळ्यात माठाची पाने खूप नाजूक होतात आणि अनेकदा त्यावर काळे किडे किंवा पानांना छिद्रे पडलेली दिसतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही माठ खरेदी कराल, तेव्हा पूर्ण जुडी उलटी करून तपासा. ताज्या माठाची पाने हलक्या लाल किंवा हिरव्या रंगाची, गुळगुळीत आणि कोणत्याही डागाशिवाय असावीत.
advertisement
6/9
 मोहरीची भाजी : मोहरीची पाने पावसाळ्यात लवकर कडू होतात. पानांवर पांढरे डाग किंवा कडा पिवळ्या पडणे हे बुरशीचे लक्षण आहे. अशी मोहरी खाल्ल्याने गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या होऊ शकतात. ताजी आणि स्वच्छ पाने असलेली मोहरीच घरी आणा.
मोहरीची भाजी : मोहरीची पाने पावसाळ्यात लवकर कडू होतात. पानांवर पांढरे डाग किंवा कडा पिवळ्या पडणे हे बुरशीचे लक्षण आहे. अशी मोहरी खाल्ल्याने गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या होऊ शकतात. ताजी आणि स्वच्छ पाने असलेली मोहरीच घरी आणा.
advertisement
7/9
 हिरवी कोथिंबीर : पावसाळ्यात हिरवी कोथिंबीर खूप लवकर सडते. कधीकधी तिची मुळे चिखलाने झाकलेली असतात, ज्यामुळे पूर्ण जुडी सडू शकते. जर ओलाव्यामुळे पानांना खराब वास येत असेल किंवा पाने कोमेजली असतील, तर अशी कोथिंबीर खरेदी करू नका. ताजी, सुकी आणि सुवासिक कोथिंबीरीला प्राधान्य द्या.
हिरवी कोथिंबीर : पावसाळ्यात हिरवी कोथिंबीर खूप लवकर सडते. कधीकधी तिची मुळे चिखलाने झाकलेली असतात, ज्यामुळे पूर्ण जुडी सडू शकते. जर ओलाव्यामुळे पानांना खराब वास येत असेल किंवा पाने कोमेजली असतील, तर अशी कोथिंबीर खरेदी करू नका. ताजी, सुकी आणि सुवासिक कोथिंबीरीला प्राधान्य द्या.
advertisement
8/9
 पुदिना : पुदिन्याची पाने पावसाळ्यात चिकट होतात आणि त्यावर बुरशीची चिन्हे दिसतात. पुदिना खरेदी करताना, त्याची पाने कुस्करून तपासा, जर त्यातून सुगंध येत नसेल किंवा पाने काळी पडली असतील, तर तो खरेदी करू नका. कुरकुरीत आणि सुवासिक पाने ही पुदिन्याची ओळख आहे.
पुदिना : पुदिन्याची पाने पावसाळ्यात चिकट होतात आणि त्यावर बुरशीची चिन्हे दिसतात. पुदिना खरेदी करताना, त्याची पाने कुस्करून तपासा, जर त्यातून सुगंध येत नसेल किंवा पाने काळी पडली असतील, तर तो खरेदी करू नका. कुरकुरीत आणि सुवासिक पाने ही पुदिन्याची ओळख आहे.
advertisement
9/9
 शेपू : शेपूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तो पावसाळ्यात लवकर सडतो. जर त्याचा देठ मऊ झाला असेल किंवा पानांना घामासारखा वास येत असेल, तर असा शेपू खरेदी करू नका. फक्त ताजी आणि कडक देठ असलेली भाजी निवडा.
शेपू : शेपूमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे तो पावसाळ्यात लवकर सडतो. जर त्याचा देठ मऊ झाला असेल किंवा पानांना घामासारखा वास येत असेल, तर असा शेपू खरेदी करू नका. फक्त ताजी आणि कडक देठ असलेली भाजी निवडा.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement