Kitchen Hacks : घरी बनवलेले साधे जेवणही लागेल रेस्टॉरंटसारखे चविष्ट! फक्त 'या' भन्नाट कुकिंग टिप्स वापरा

Last Updated:
Cooking tips for beginners : तुम्हालाही घरचं रोजचं जेवण करायची इच्छा होत नाही का? अनेक लोकांना वाटतं की, चव आणण्यासाठी महागडे मसाले किंवा खास रेसिपी लागतात, पण सत्य यापेक्षा वेगळं आहे. खरं तर किचनमध्ये होणाऱ्या काही सामान्य चुका जेवणाची चव बिघडवतात. त्या दुरुस्त केल्या तर साधं जेवणही खास बनू शकतं. या लेखात जाणून घ्या अशा काही भन्नाट कुकिंग टिप्स, ज्या तुमच्या जेवणाला एकदम मजेशीर आणि चविष्ट बनवतील.
1/7
बहुतेक वेळा घरचं रोजचं जेवण चवीला साधंसं वाटतं, पण तेच जेवण थोडी समजूतदारी आणि योग्य तंत्र वापरून बनवलं तर खूपच रुचकर बनू शकतं. कुकिंग म्हणजे फक्त रेसिपी नव्हे, तर योग्य वेळ, योग्य मसाले आणि योग्य पद्धतीचा समतोल आहे. काही सोप्या कुकिंग टिप्स वापरून तुम्ही डाळ, भाजी, भात आणि पोळी यांसारख्या साध्या पदार्थांनाही रेस्टॉरंटसारखी चव देऊ शकता.
बहुतेक वेळा घरचं रोजचं जेवण चवीला साधंसं वाटतं, पण तेच जेवण थोडी समजूतदारी आणि योग्य तंत्र वापरून बनवलं तर खूपच रुचकर बनू शकतं. कुकिंग म्हणजे फक्त रेसिपी नव्हे, तर योग्य वेळ, योग्य मसाले आणि योग्य पद्धतीचा समतोल आहे. काही सोप्या कुकिंग टिप्स वापरून तुम्ही डाळ, भाजी, भात आणि पोळी यांसारख्या साध्या पदार्थांनाही रेस्टॉरंटसारखी चव देऊ शकता.
advertisement
2/7
कोणत्याही पदार्थाची चव मसाल्यांवर अवलंबून असते. मसाले जास्त किंवा कमी घातले तरी चव बिघडू शकते. अख्खे मसाले थोडेसे भाजून दळल्यास त्यांचा सुगंध आणि चव दोन्ही वाढते. हळद, धणे आणि लाल तिखट नेहमी मंद आचेवर घाला, जेणेकरून ते जळणार नाहीत. मसाल्यांचा योग्य क्रम आणि समतोल साध्या जेवणालाही खास बनवतो.
कोणत्याही पदार्थाची चव मसाल्यांवर अवलंबून असते. मसाले जास्त किंवा कमी घातले तरी चव बिघडू शकते. अख्खे मसाले थोडेसे भाजून दळल्यास त्यांचा सुगंध आणि चव दोन्ही वाढते. हळद, धणे आणि लाल तिखट नेहमी मंद आचेवर घाला, जेणेकरून ते जळणार नाहीत. मसाल्यांचा योग्य क्रम आणि समतोल साध्या जेवणालाही खास बनवतो.
advertisement
3/7
प्रत्येक भाजी किंवा डाळीसाठी एकाच प्रकारचं तेल योग्य नसतं. मोहरीचं तेल भाज्यांना तिखटपणा देतं, तर तूप डाळ आणि खिचडीत गहिरा स्वाद आणतं. रिफाइंड तेलाऐवजी देशी पर्याय वापरल्यास चवीसोबत आरोग्यही चांगलं राहतं. तेल योग्य तापमानावर गरम करणं महत्त्वाचं आहे. कारण कच्चं किंवा जळलेलं तेल जेवणाची चव खराब करतं.
प्रत्येक भाजी किंवा डाळीसाठी एकाच प्रकारचं तेल योग्य नसतं. मोहरीचं तेल भाज्यांना तिखटपणा देतं, तर तूप डाळ आणि खिचडीत गहिरा स्वाद आणतं. रिफाइंड तेलाऐवजी देशी पर्याय वापरल्यास चवीसोबत आरोग्यही चांगलं राहतं. तेल योग्य तापमानावर गरम करणं महत्त्वाचं आहे. कारण कच्चं किंवा जळलेलं तेल जेवणाची चव खराब करतं.
advertisement
4/7
फोडणी कोणत्याही साध्या डाळी किंवा भाजीला नवं जीवन देऊ शकते. जिरे, मोहरी, लसूण, हिंग आणि सुक्या लाल मिरचीची फोडणी चव अनेक पटींनी वाढवते. फोडणी नेहमी चांगल्या गरम तेलात किंवा तुपात द्या, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध पूर्णपणे बाहेर येईल. शेवटी घातलेली फोडणी पदार्थात एक वेगळीच लेयर जोडते.
फोडणी कोणत्याही साध्या डाळी किंवा भाजीला नवं जीवन देऊ शकते. जिरे, मोहरी, लसूण, हिंग आणि सुक्या लाल मिरचीची फोडणी चव अनेक पटींनी वाढवते. फोडणी नेहमी चांगल्या गरम तेलात किंवा तुपात द्या, जेणेकरून मसाल्यांचा सुगंध पूर्णपणे बाहेर येईल. शेवटी घातलेली फोडणी पदार्थात एक वेगळीच लेयर जोडते.
advertisement
5/7
मीठ कधी घालायचं, याचाही चवीवर मोठा परिणाम होतो. भाज्यांमध्ये सुरुवातीला मीठ घातल्यास त्या लवकर शिजतात तर डाळीत मध्ये मीठ घालणं अधिक चांगलं ठरतं. गरजेपेक्षा जास्त मीठ चव बिघडवू शकतं, म्हणून नेहमी कमी प्रमाणापासून सुरुवात करा. योग्य वेळी घातलेलं मीठ इतर सर्व मसाल्यांची चव खुलवण्याचं काम करतं.
मीठ कधी घालायचं, याचाही चवीवर मोठा परिणाम होतो. भाज्यांमध्ये सुरुवातीला मीठ घातल्यास त्या लवकर शिजतात तर डाळीत मध्ये मीठ घालणं अधिक चांगलं ठरतं. गरजेपेक्षा जास्त मीठ चव बिघडवू शकतं, म्हणून नेहमी कमी प्रमाणापासून सुरुवात करा. योग्य वेळी घातलेलं मीठ इतर सर्व मसाल्यांची चव खुलवण्याचं काम करतं.
advertisement
6/7
जास्त आचेवर शिजवलेलं जेवण अनेकदा बाहेरून जळतं आणि आतून कच्चं राहतं. मंद आचेवर शिजवल्याने मसाले आणि साहित्य एकमेकांत नीट मिसळतात. भाजी, डाळ किंवा ग्रेव्हीला थोडा वेळ दिल्यास चव अधिक खोल होते. संयमाने शिजवलेलं जेवण नेहमीच अधिक चविष्ट आणि सुगंधी बनतं.
जास्त आचेवर शिजवलेलं जेवण अनेकदा बाहेरून जळतं आणि आतून कच्चं राहतं. मंद आचेवर शिजवल्याने मसाले आणि साहित्य एकमेकांत नीट मिसळतात. भाजी, डाळ किंवा ग्रेव्हीला थोडा वेळ दिल्यास चव अधिक खोल होते. संयमाने शिजवलेलं जेवण नेहमीच अधिक चविष्ट आणि सुगंधी बनतं.
advertisement
7/7
भाज्या चीरण्याची पद्धतसुद्धा चव बदलते. फार बारीक किंवा फार जाड काप केल्यास टेक्स्चर बिघडू शकतो. ताज्या भाज्या आणि कोथिंबीर, आलं किंवा लिंबाचा हलका वापर जेवणाला फ्रेश टच देतो. शेवटी घातलेली कोथिंबीर किंवा लिंबाचे काही थेंब साध्या जेवणालाही खास बनवतात.
भाज्या चीरण्याची पद्धतसुद्धा चव बदलते. फार बारीक किंवा फार जाड काप केल्यास टेक्स्चर बिघडू शकतो. ताज्या भाज्या आणि कोथिंबीर, आलं किंवा लिंबाचा हलका वापर जेवणाला फ्रेश टच देतो. शेवटी घातलेली कोथिंबीर किंवा लिंबाचे काही थेंब साध्या जेवणालाही खास बनवतात.
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement