advertisement

Salt On Fruits : फळांवर मीठ टाकून का खाऊ नये? चविष्ट लागतात पण परिणाम वाईट

Last Updated:
Salt On Fruits Side Effects : फळांवर मीठ टाकून खाण्याची सवय अनेकांना आहे. यामुळे फळ चविष्ट लागतात. पण मिठामुळे हीच हेल्दी फळं आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
1/5
फळं आरोग्यासाठी चांगली. पण बहुतेक लोक काही फळांवर मीठ टाकून खातात. बाहेरही तुम्ही फ्रुट प्लेट घ्याल तेव्हा त्यावर मीठ किंवा चाट मसाला टाकलेला पाहाल. यामुळे फळं चविष्ट लागतात. फळांची चव वाढण्यासाठी ही सवय योग्य वाटते, पण आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र दोन्ही दृष्टीने पाहिल्यास ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही.
फळं आरोग्यासाठी चांगली. पण बहुतेक लोक काही फळांवर मीठ टाकून खातात. बाहेरही तुम्ही फ्रुट प्लेट घ्याल तेव्हा त्यावर मीठ किंवा चाट मसाला टाकलेला पाहाल. यामुळे फळं चविष्ट लागतात. फळांची चव वाढण्यासाठी ही सवय योग्य वाटते, पण आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र दोन्ही दृष्टीने पाहिल्यास ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही.
advertisement
2/5
आयुर्वेदानुसार प्रत्येक अन्नपदार्थाची एक विशिष्ट प्रकृती असते. फळं बहुतेक वेळा गोड, थंड आणि लवकर पचणारी असतात. त्याउलट मीठ उष्ण आणि पचनाग्नी वाढवणारं मानलं जातं. हे दोन विरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ एकत्र म्हणजे हा विरुद्ध आहार ठरतो. विरुद्ध आहारामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि शरीरात आम म्हणजे विषारी घटक तयार होण्याची शक्यता वाढते.
आयुर्वेदानुसार प्रत्येक अन्नपदार्थाची एक विशिष्ट प्रकृती असते. फळं बहुतेक वेळा गोड, थंड आणि लवकर पचणारी असतात. त्याउलट मीठ उष्ण आणि पचनाग्नी वाढवणारं मानलं जातं. हे दोन विरुद्ध गुणधर्मांचे पदार्थ एकत्र म्हणजे हा विरुद्ध आहार ठरतो. विरुद्ध आहारामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि शरीरात आम म्हणजे विषारी घटक तयार होण्याची शक्यता वाढते.
advertisement
3/5
फळं स्वतंत्रपणे खाल्ल्यास ती पटकन पचतात. मात्र त्यावर मीठ टाकल्यास पचनाची नैसर्गिक गती बिघडते. परिणामी गॅस, आम्लता, पोट फुगणं. अपचन अशा तक्रारी वारंवार उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी ही सवय अधिक त्रासदायक ठरते. आयुर्वेदानुसार विरुद्ध आहारामुळे त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. काही लोकांमध्ये खाज, पुरळ, अॅलर्जी अशा समस्या दिसून येतात. फळं आणि मीठ एकत्र घेतल्याने पित्त वाढण्याची शक्यता असते.
फळं स्वतंत्रपणे खाल्ल्यास ती पटकन पचतात. मात्र त्यावर मीठ टाकल्यास पचनाची नैसर्गिक गती बिघडते. परिणामी गॅस, आम्लता, पोट फुगणं. अपचन अशा तक्रारी वारंवार उद्भवू शकतात. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी ही सवय अधिक त्रासदायक ठरते. आयुर्वेदानुसार विरुद्ध आहारामुळे त्वचेवरही परिणाम होऊ शकतो. काही लोकांमध्ये खाज, पुरळ, अॅलर्जी अशा समस्या दिसून येतात. फळं आणि मीठ एकत्र घेतल्याने पित्त वाढण्याची शक्यता असते.
advertisement
4/5
मीठ म्हणजे सोडियमचा प्रमुख स्रोत. फळांवर मीठ टाकून खाल्ल्यास शरीरात नकळत जास्त सोडियम जातं. जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाबाचा धोका, शरीरात पाणी धरून राहणं, किडनीवर ताण या समस्या वाढू शकतात. बीपी, हृदयविकार किंवा किडनीच्या तक्रारी असलेल्या लोकांनी ही सवय टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
मीठ म्हणजे सोडियमचा प्रमुख स्रोत. फळांवर मीठ टाकून खाल्ल्यास शरीरात नकळत जास्त सोडियम जातं. जास्त सोडियममुळे उच्च रक्तदाबाचा धोका, शरीरात पाणी धरून राहणं, किडनीवर ताण या समस्या वाढू शकतात. बीपी, हृदयविकार किंवा किडनीच्या तक्रारी असलेल्या लोकांनी ही सवय टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
advertisement
5/5
कच्चा आंबा किंवा पेरू यांसारख्या काही फळांवर क्वचित, चिमूटभर सैंधव मीठ चालू शकतं, पण ती रोजची सवय नसावी. पण केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब अशा फळांवर मीठ बिलकुल टाकू नका. मिठाऐवजी चाट मसालाही नको. कधीतरी लिंबाचा रस टाकू शकता. (सर्व फोटो : AI Generated)
कच्चा आंबा किंवा पेरू यांसारख्या काही फळांवर क्वचित, चिमूटभर सैंधव मीठ चालू शकतं, पण ती रोजची सवय नसावी. पण केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब अशा फळांवर मीठ बिलकुल टाकू नका. मिठाऐवजी चाट मसालाही नको. कधीतरी लिंबाचा रस टाकू शकता. (सर्व फोटो : AI Generated)
advertisement
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement