रात्री कारलं खाणं ठरू शकतं धोकादायक! शुगरच्या रुग्णांनी तर अशी चूक करूच नये
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
चवीला कडू असणारं कारलं आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं. कारलं शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतं. शुगरचे रुग्णही कारलं खाऊ शकतात. परंतु, कारल्याची भाजी रात्री खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. कारण आरोग्यास ते धोकादायक ठरू शकतं. विशेषत: ज्यांचं पोट खराब आहे, त्यांनी तर ते टाळलंच पाहिजे.
झारखंडची राजधानी रांचीचे आयुर्वेदिक डॉ व्हीके पांडे यांनी कारल्याच्या गुणधर्मांबाबत माहिती दिलीय. कारल्याची भाजी रात्री चुकूनही खाऊ नये. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, असे ते सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement