Vegetable Should Not Eat Raw : 'या' 4 भाज्या कधीही कच्च्या खाऊ नका, सॅलेडमध्ये वापराल तर फायदा नाही उलट उद्भवेल नवीन आजार
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Vegetable Should Not Eat Raw : आपण सगळेच वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. काही जणांना भाज्या शिजवून आवडतात तर काही जणांना कच्च्या सॅलडमध्ये आवडतात. पण सगळ्या भाज्या कच्च्या खाणं शरीरासाठी फायद्याचं नाही तर उलट हानिकारक ठरु शकतं.
advertisement
advertisement
आपण सगळेच वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो. काही जणांना भाज्या शिजवून आवडतात तर काही जणांना कच्च्या सॅलडमध्ये आवडतात. काही लोक तर म्हणतात की भाज्या शिजवण्यापेक्षा कच्च्या खाल्ल्या तर जास्त फायदेशीर असतात. योगा आणि निसर्गोपचार करणारे लोक तर हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. ते तर असंही म्हणतात की भाज्या खाल्ल्या नाहीत तर आजारी पडाल. पण आयुर्वेदात मात्र काही भाज्या कच्च्या खाण्यास मनाई आहे.
advertisement
advertisement
advertisement
आयुर्वेदानुसार अनेक भाज्या कच्च्या खाण्यास मनाई आहे. आजकाल शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे भाज्या कच्च्या खाऊ नयेत. जर भाज्या रासायनिक खतांशिवाय पिकवल्या असतील तरच त्या कच्च्या खाऊ शकतो. बरेच लोक शिमला मिरची कच्ची खातात पण शिमला मिरची कधीही कच्ची खाऊ नये. ती उकळून किंवा शिजवूनच खावी.
advertisement
advertisement
डॉक्टर राकेश सांगतात की पालकही कच्चा खाऊ नये. अनेक जण पालक कच्चा किंवा त्याचे तुकडे करून खातात. तर काही लोक त्याचा ज्युस पितात. पण पालकामध्ये अनेक किडे असतात, विशेषतः ई. कोलाय बॅक्टेरिया. हे आपल्या शरीराला हानिकारक असतात. या हिरव्या भाज्यांमध्ये अनेकदा कृमी आढळतात जे आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे या हिरव्या भाज्या हलक्या वाफवूनच खाव्यात.