सुकामेवा नाही, जेवणच देतं पोषक तत्त्व; डोंगराळ भागात थंडीत 'असं' होतं संरक्षण
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपला भारत विविधतेने नटलेला आहे. इथं जेवणापासून राहणीमानापर्यंत सर्वत्र विविधता आढळते. भारताच्या डोंगराळ भागात उगणाऱ्या धान्यापासून अतिशय स्वादिष्ट असे पदार्थ बनवले जातात. त्यापैकी काही खास पदार्थ आपण पाहणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
भांग प्यायल्यास नशा येते असं म्हणतात. परंतु याच भांगेची शेती केली जाते आणि तिचं योग्य पद्धतीने सेवन केल्यास शरिराला अनेक फायदे होतात, असंही म्हटलं जातं. भांगेच्या बिया केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. शिवाय यामुळे तणाव कमी होतो आणि झोपही चांगली लागते. डोंगराळ भागात भांगेच्या बियांची चटणी बनवून खाल्ली जाते. शिवाय या बियांच्या रसाचा विविध भाज्यांमध्ये आणि वरणात समावेश केला जातो.
advertisement