Mango : घरी आणलेले आंबे खाण्यापूर्वी पाण्यात का बुडवून ठेवावेत? 99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर

Last Updated:
अनेक जण आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवतात. त्यामागेही शास्त्रीय कारण आहे. 
1/6
उन्हाळ्याची चाहूल लागते ती कैरी, कलिंगड अशा फळांच्या आगमनाने. काहीच दिवसांत आंबे बाजारात येतात. वास्तविक आंबा हे फळ उष्ण प्रकृतीचं असतं; मात्र ते उन्हाळ्यातच येतं. त्यामुळे आंबे खाताना ही बाब लक्षात ठेवावी लागते. अनेक जण आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवतात. त्यामागेही शास्त्रीय कारण आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागते ती कैरी, कलिंगड अशा फळांच्या आगमनाने. काहीच दिवसांत आंबे बाजारात येतात. वास्तविक आंबा हे फळ उष्ण प्रकृतीचं असतं; मात्र ते उन्हाळ्यातच येतं. त्यामुळे आंबे खाताना ही बाब लक्षात ठेवावी लागते. अनेक जण आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवतात. त्यामागेही शास्त्रीय कारण आहे.
advertisement
2/6
केशर, पायरी, दशहरा, लंगडा, हापूस अशा आंब्याच्या अनेक प्रजाती आहेत. प्रत्येक जातीच्या आंब्याचा स्वाद वेगवेगळा असतो. आंबा खाण्याच्याही निरनिराळ्या पद्धती आहेत. तो किती प्रमाणात खावा, तसंच त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील याचेही काही नियम असतात. आजकाल आंबे कृत्रिमरीत्याही पिकवलेले असतात. ते ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवले जातात. असं म्हणतात, की पाण्यात बुडवून ठेवल्यानं आंबा प्रकृतीला बाधत नाही. यामागे शास्त्रीय कारणही आहे.
केशर, पायरी, दशहरा, लंगडा, हापूस अशा आंब्याच्या अनेक प्रजाती आहेत. प्रत्येक जातीच्या आंब्याचा स्वाद वेगवेगळा असतो. आंबा खाण्याच्याही निरनिराळ्या पद्धती आहेत. तो किती प्रमाणात खावा, तसंच त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतील याचेही काही नियम असतात. आजकाल आंबे कृत्रिमरीत्याही पिकवलेले असतात. ते ओळखण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकीच एक म्हणजे आंबे खाण्याआधी ते काही तास पाण्यात बुडवून ठेवले जातात. असं म्हणतात, की पाण्यात बुडवून ठेवल्यानं आंबा प्रकृतीला बाधत नाही. यामागे शास्त्रीय कारणही आहे.
advertisement
3/6
आंबा पाण्यात बुडवून ठेवण्याच्या पद्धतीबद्दल इंडियन एक्स्प्रेसने एक रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार, जिंदल नेचरक्युअर इन्स्टिट्यूटच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुषमा पी.एस. यांनी म्हटलंय, की खाण्याआधी आंबे एक तासभर पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातल्या फायटिक अ‍ॅसिडचं प्रमाण खूप कमी होतं. हे फायटिक अ‍ॅसिड शरीरात खनिजांचं शोषण कमी करतं. लोह, जस्त आणि कॅल्शियमसारखी खनिजं शोषून घेण्याची शरीराची क्षमता ते कमी करतं. आंबे एक ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातलं अतिरिक्त फायटिक अ‍ॅसिड कमी होतं. त्यामुळे पोषणमूल्यं शरीरात योग्य पद्धतीनं शोषून घेतली जातात.
आंबा पाण्यात बुडवून ठेवण्याच्या पद्धतीबद्दल इंडियन एक्स्प्रेसने एक रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार, जिंदल नेचरक्युअर इन्स्टिट्यूटच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुषमा पी.एस. यांनी म्हटलंय, की खाण्याआधी आंबे एक तासभर पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातल्या फायटिक अ‍ॅसिडचं प्रमाण खूप कमी होतं. हे फायटिक अ‍ॅसिड शरीरात खनिजांचं शोषण कमी करतं. लोह, जस्त आणि कॅल्शियमसारखी खनिजं शोषून घेण्याची शरीराची क्षमता ते कमी करतं. आंबे एक ते दोन तास पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातलं अतिरिक्त फायटिक अ‍ॅसिड कमी होतं. त्यामुळे पोषणमूल्यं शरीरात योग्य पद्धतीनं शोषून घेतली जातात.
advertisement
4/6
फायटिक अ‍ॅसिड हे सगळ्या झाडांच्या बियांमध्ये आढळतं. ते खनिजं शोषून घेण्याचं प्रमाण कमी करतं. त्याच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल बराच अभ्यास करण्यात आलाय. फायटिक अ‍ॅसिडमुळे शरीरात खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते.
फायटिक अ‍ॅसिड हे सगळ्या झाडांच्या बियांमध्ये आढळतं. ते खनिजं शोषून घेण्याचं प्रमाण कमी करतं. त्याच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांबद्दल बराच अभ्यास करण्यात आलाय. फायटिक अ‍ॅसिडमुळे शरीरात खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते.
advertisement
5/6
तज्ज्ञांच्या मते, आंबे कमीत कमी एक ते दोन तास भरपूर पाण्यात बुडवून ठेवावेत. तेवढं शक्य नसेल, तर किमान 25-30 मिनिटं तरी पाण्यात ठेवणं गरजेचं असतं. यामुळे आंब्यातली पोषणमूल्यं शरीराला मिळतातच; शिवाय मुरुमं, त्वचेच्या समस्या, बद्धकोष्ठता, आतड्यांशी संबंधित समस्या कमी होण्यासही मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, आंबे कमीत कमी एक ते दोन तास भरपूर पाण्यात बुडवून ठेवावेत. तेवढं शक्य नसेल, तर किमान 25-30 मिनिटं तरी पाण्यात ठेवणं गरजेचं असतं. यामुळे आंब्यातली पोषणमूल्यं शरीराला मिळतातच; शिवाय मुरुमं, त्वचेच्या समस्या, बद्धकोष्ठता, आतड्यांशी संबंधित समस्या कमी होण्यासही मदत होते.
advertisement
6/6
आंब्यामुळे शरीरातली उष्णता वाढत नाही. पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातल्या पाण्याचं प्रमाण वाढतं व त्यांचा स्वादही आणखी छान होतो. यंदाच्या उन्हाळ्यात आंबे खाण्याआधी ते किमान तासभर पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे त्यातली पोषणमूल्यं अधिक चांगल्या प्रकारे शरीराला मिळतील आणि शरीराला त्रासही होणार नाही.
आंब्यामुळे शरीरातली उष्णता वाढत नाही. पाण्यात बुडवून ठेवल्यानं त्यातल्या पाण्याचं प्रमाण वाढतं व त्यांचा स्वादही आणखी छान होतो. यंदाच्या उन्हाळ्यात आंबे खाण्याआधी ते किमान तासभर पाण्यात बुडवून ठेवा. त्यामुळे त्यातली पोषणमूल्यं अधिक चांगल्या प्रकारे शरीराला मिळतील आणि शरीराला त्रासही होणार नाही.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement