Weather Alert : ताशी 50 किमी वाऱ्यांची शक्यता, छत्रपती संभाजीनगर-बीडसह अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा धोका!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. वाहतूक करणाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीची माहिती घेऊन प्रवास करावा.
advertisement
advertisement
या हवामानामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. 12 मे रोजीही हवामानात अस्थिरता कायम राहणार आहे. या दिवशीही वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे. या हवामानामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळे येऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. 13 मे रोजी हवामानात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement