निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य; ओसाड माळरानावर फुलवलं नंदनवन पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. धाराशिव जिल्ह्यातील एका निसर्ग प्रेमीने तीनशे एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर वनराईने नटवलाय.
वृक्ष लागवड आणि संगोपन ही आता काळाजी गरज बनलीय. काही निसर्गप्रेमी आपलं आख्खं आयुष्य निसर्गासाठी वाहून घेतात. धाराशिव जिल्ह्यातील एका निसर्ग प्रेमीने तीनशे एकर उजाड आणि ओसाड असलेला परिसर वनराईने नटवलाय. 1 लाख 5 हजार वृक्षांची लागवड करून नंदनवन फुलवलेय. तर ध्यान केंद्राच्या माध्यमातून ध्यान साधना आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा ही समावेश त्यांनी याठिकाणी केलाय.
advertisement
advertisement
त्यामध्ये फळांची फुलांची आणि औषधी वनस्पतींची लागवड केलीय. कडुलिंब, आंबा, पेरू, अंजीर, सिताफळ, ड्रॅगन, औषधी वनस्पती साग, गळलिंबू त्याचबरोबर गुलमोहर यासह अनेक देशी-विदेशी दुर्मिळ वृक्षांची लागवड केली आहे. इथं पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा आवाज, कोल्ह्यांची कोल्हेकुई आणि पशुपक्ष्यांचे थवे निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य अनुभवायला मिळंतय.
advertisement
advertisement
advertisement
वनराईने नटलेल्या या परिसरात आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारलेय. ध्यान केंद्र-स्वामी सर्वेषानंद यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान धरणा केली जाते. या ठिकाणी अध्यात्मिक ग्रंथ पुस्तके आणि स्वामीजींचे मार्गदर्शन उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ व्यतीथ करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी साधना करता येतेय. निवासाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.