एक लाकूडही न जाळता रोज तयार होतो 1 टन खवा, धाराशिवच्या उद्योजकाचा आदर्श प्रयोग

Last Updated:
धाराशिवमधील एका उद्योजकानं एक पर्यावरणपुरक उद्योगाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. त्यामुळे रोज 4 टन लाकडांची बचत होणार आहे.
1/7
सध्याच्या काळात काही युवा उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. त्यातच अलिकडे पर्यावरणपुरक सौर ऊर्जेच्या वापराकडेही लोकांचा कल वाढतोय.
सध्याच्या काळात काही युवा उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेत आहेत. त्यातच अलिकडे पर्यावरणपुरक सौर ऊर्जेच्या वापराकडेही लोकांचा कल वाढतोय.
advertisement
2/7
 धाराशिवमधील एका उद्योजकानं एक पर्यावरणपुरक उद्योगाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. त्यामुळे रोज 4 टन लाकडांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे विनोद जोगदंड यांनी देशातील पहिलाच सौर ऊर्जेवर चालणारा खवा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. यातून ते रोज 1 टन खव्याची निर्मिती करत असून चांगला नफा मिळवत आहेत.
धाराशिवमधील एका उद्योजकानं एक पर्यावरणपुरक उद्योगाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय. त्यामुळे रोज 4 टन लाकडांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे विनोद जोगदंड यांनी देशातील पहिलाच सौर ऊर्जेवर चालणारा खवा निर्मिती प्रकल्प उभारला आहे. यातून ते रोज 1 टन खव्याची निर्मिती करत असून चांगला नफा मिळवत आहेत.
advertisement
3/7
खवा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून लाकडाची गरज पडते. परंतु हाच खवा सौरऊर्जेवर निर्मिती करण्याचा प्रकल्प उद्योजक विनोद जोगदंड यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील एम आय डीसी मध्ये सुरू केला आहे. या प्रकल्पाची दररोज खवा निर्मिती करण्याची क्षमता चार टनाची आहे तर दररोज एक टन खव्याची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते.
खवा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून लाकडाची गरज पडते. परंतु हाच खवा सौरऊर्जेवर निर्मिती करण्याचा प्रकल्प उद्योजक विनोद जोगदंड यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरातील एम आय डीसी मध्ये सुरू केला आहे. या प्रकल्पाची दररोज खवा निर्मिती करण्याची क्षमता चार टनाची आहे तर दररोज एक टन खव्याची निर्मिती या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येते.
advertisement
4/7
एक टन खवा निर्मिती करण्यासाठी चार टन लाकूड इंधन म्हणून वापरले जात होते. हे लाकूड आता वापरले जात नाही. सौर ऊर्जेवरील खवा प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड थांबली आहे. तर खव्याची गुणवत्ता देखील चांगली असून खव्याला बाजारात मोठी मागणी आहे.
एक टन खवा निर्मिती करण्यासाठी चार टन लाकूड इंधन म्हणून वापरले जात होते. हे लाकूड आता वापरले जात नाही. सौर ऊर्जेवरील खवा प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड थांबली आहे. तर खव्याची गुणवत्ता देखील चांगली असून खव्याला बाजारात मोठी मागणी आहे.
advertisement
5/7
सौर ऊर्जाच्या माध्यमातून हायजेनिक आणि चांगल्या प्रतीचा खवा व पेढा निर्माण होतोय. पॅकिंगच्या माध्यमातून खवा व पेढा लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे बाजारात या खवा व पेढ्याला मोठी मागणी असल्याचे निर्मल मिल्क प्रोडक्शन असोसिएशनचे संचालक विनोद जोगदंड यांनी सांगितले.
सौर ऊर्जाच्या माध्यमातून हायजेनिक आणि चांगल्या प्रतीचा खवा व पेढा निर्माण होतोय. पॅकिंगच्या माध्यमातून खवा व पेढा लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे बाजारात या खवा व पेढ्याला मोठी मागणी असल्याचे निर्मल मिल्क प्रोडक्शन असोसिएशनचे संचालक विनोद जोगदंड यांनी सांगितले.
advertisement
6/7
इंधनावर एक टन खवा निर्मिती करण्यासाठी जोगदंड यांना 20 कामगारांची गरज भासायची आणि दररोज चार टन लाकूड जाळावे लागायचे. तर सौर ऊर्जेवरील या प्रकल्पामुळे केवळ दोन कामगार दररोज एक टन खवा निर्मिती करतात. त्यामुळे इंधनावरील व कामगारावरील होणारा खर्च कमी झाले. तसेच लाकूड जाळल्याने होणारे प्रदुषण आणि वृक्षतोड दोन्ही थांबले आहे, असे जोगदंड सांगतात.
इंधनावर एक टन खवा निर्मिती करण्यासाठी जोगदंड यांना 20 कामगारांची गरज भासायची आणि दररोज चार टन लाकूड जाळावे लागायचे. तर सौर ऊर्जेवरील या प्रकल्पामुळे केवळ दोन कामगार दररोज एक टन खवा निर्मिती करतात. त्यामुळे इंधनावरील व कामगारावरील होणारा खर्च कमी झाले. तसेच लाकूड जाळल्याने होणारे प्रदुषण आणि वृक्षतोड दोन्ही थांबले आहे, असे जोगदंड सांगतात.
advertisement
7/7
नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. सीएमईजीपी, पीएमईजीपी, स्मार्ट, पोखरा या योजनांच्या माध्यमातून खवा उत्पादक व पेढा उत्पादक, दूध उत्पादक, महिला बचत गट, शेतकरी गट तसेच नव उद्योजकांना अनुदान मिळते. जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासनाकडून 25 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदानाच्या स्वरूपात सहकार्य होते, असेही जोगदंड यांनी सांगितले.
नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळते. सीएमईजीपी, पीएमईजीपी, स्मार्ट, पोखरा या योजनांच्या माध्यमातून खवा उत्पादक व पेढा उत्पादक, दूध उत्पादक, महिला बचत गट, शेतकरी गट तसेच नव उद्योजकांना अनुदान मिळते. जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर शासनाकडून 25 ते 60 टक्क्यांपर्यंत अनुदानाच्या स्वरूपात सहकार्य होते, असेही जोगदंड यांनी सांगितले.
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement