Nashik : टाक की उडी, नाशिककर रहाडीत मनसोक्त बुडाले; पेशवेकालीन प्रथा आहे तरी काय? Photos

Last Updated:
नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रहाडीत उडी घेण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. तेव्हा या रहाड रंगपंचमीचे महत्व काय आहे याविषयी जाणून घेऊयात.
1/5
जुन्या नाशकात असणाऱ्या रहाडीत, रंग खेळण्याची सुरुवात ही पेशव्यांच्या प्रोत्साहनानं झाली. येथे तब्बल 14 रहाडी होत्या. रहाड म्हणजे 15 बाय 15 चा हौद,तब्बल 8 फूट खोल असलेल्या या रहाडीत खेळण्यासाठी तयार करण्यात येणारा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असतो. आजही ही परंपरा जपली जाते. 
जुन्या नाशकात असणाऱ्या रहाडीत, रंग खेळण्याची सुरुवात ही पेशव्यांच्या प्रोत्साहनानं झाली. येथे तब्बल 14 रहाडी होत्या. रहाड म्हणजे 15 बाय 15 चा हौद,तब्बल 8 फूट खोल असलेल्या या रहाडीत खेळण्यासाठी तयार करण्यात येणारा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असतो. आजही ही परंपरा जपली जाते. 
advertisement
2/5
शहरात रंगपंचमीच्या दिवशी 5 रहाडी, दर रंगपंचमीला खुल्या केल्या जातात.शहरातील प्रत्येक रहाडीत तयार करण्यात आलेला रंग हा वेगवेगळ्या फुलांपासून तयार केला जातो. आपली परंपरा जपत, या हौद सदृश्य रहाडीत रंगपंचमी खेळली जाते.
शहरात रंगपंचमीच्या दिवशी 5 रहाडी, दर रंगपंचमीला खुल्या केल्या जातात.शहरातील प्रत्येक रहाडीत तयार करण्यात आलेला रंग हा वेगवेगळ्या फुलांपासून तयार केला जातो. आपली परंपरा जपत, या हौद सदृश्य रहाडीत रंगपंचमी खेळली जाते.
advertisement
3/5
रहाड म्हणजे काय? रहाड म्हणजे, भूमिगत हौद .पेशव्यांचं पुण्यासोबतच नाशकातही आपलं बरचसं प्रस्थान बसवलं होतं. जुन्या नाशकात पेशव्यांच्या अनेक वास्तू आजही जतन करण्यात आल्यात. सरकारवाडा असो की पेशवे महाल. पेशव्यांचे अनेक महत्वाचे सरदार नाशकात होते. त्यांचे आखाडे आजही साक्ष देतात.
रहाड म्हणजे काय? रहाड म्हणजे, भूमिगत हौद .पेशव्यांचं पुण्यासोबतच नाशकातही आपलं बरचसं प्रस्थान बसवलं होतं. जुन्या नाशकात पेशव्यांच्या अनेक वास्तू आजही जतन करण्यात आल्यात. सरकारवाडा असो की पेशवे महाल. पेशव्यांचे अनेक महत्वाचे सरदार नाशकात होते. त्यांचे आखाडे आजही साक्ष देतात.
advertisement
4/5
रंगात रंगून,रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करणाऱ्या या अनोख्या रहाडी रंगपंचमीचं उगमस्थान हे नाशिकला मानलं जातं. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच येणारा हा उत्सव म्हणजे निसर्गाच्या अनोख्या किमयेचा जादूगारच. याच दिवसात येणाऱ्या अनेक रंगी फुलांपासून तयार केला जाणारा रंग म्हणजे या रहाडीचं खरं आकर्षण. कोणत्याही प्रकारचं केमिकल यात नसतं. तब्बल 5 तास ही फुलं उकळून, घोटून त्यांचा रस तयार केला जातो. रहाडी अर्थात खुल्या केलेल्या या भूमिगत हौदात असलेलं हे पाणी शरीराला अत्यंत गुणकारी मानलं जातं.
रंगात रंगून,रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करणाऱ्या या अनोख्या रहाडी रंगपंचमीचं उगमस्थान हे नाशिकला मानलं जातं. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच येणारा हा उत्सव म्हणजे निसर्गाच्या अनोख्या किमयेचा जादूगारच. याच दिवसात येणाऱ्या अनेक रंगी फुलांपासून तयार केला जाणारा रंग म्हणजे या रहाडीचं खरं आकर्षण. कोणत्याही प्रकारचं केमिकल यात नसतं. तब्बल 5 तास ही फुलं उकळून, घोटून त्यांचा रस तयार केला जातो. रहाडी अर्थात खुल्या केलेल्या या भूमिगत हौदात असलेलं हे पाणी शरीराला अत्यंत गुणकारी मानलं जातं.
advertisement
5/5
या पाण्यात अंघोळ केल्याने, त्वचेचे आजार दूर होतात असेही अनेक दाखले आहेत. एकमेकांना धप्पा देत या पाण्यात ढकलण्याची एक वेगळीच गम्मत असते. रहाडी रंगपंचमी खेळून झाल्यावर या हौद पुन्हा बुझवले जातात. त्यावर सागवानी लाकडांच्या मोठमोठ्या रिफांचं आच्छादन टाकलं जातं. असं म्हणतात की, या सागाच्या रिफाही जवळपास 300 वर्ष जुन्या आहेत.
या पाण्यात अंघोळ केल्याने, त्वचेचे आजार दूर होतात असेही अनेक दाखले आहेत. एकमेकांना धप्पा देत या पाण्यात ढकलण्याची एक वेगळीच गम्मत असते. रहाडी रंगपंचमी खेळून झाल्यावर या हौद पुन्हा बुझवले जातात. त्यावर सागवानी लाकडांच्या मोठमोठ्या रिफांचं आच्छादन टाकलं जातं. असं म्हणतात की, या सागाच्या रिफाही जवळपास 300 वर्ष जुन्या आहेत.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement