पहिल्या महायुद्धात सांडलं होतं सातारकरांचं रक्त, 278 वीरांचं हे स्मारक देतंय साक्ष
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
साताऱ्यात 14 गुंठे जागेत शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानाची निर्मिती करण्यात येतेय. या उद्यानात स्मृतिस्तंभ तसेच गोलाकार भिंतीवर 278 हुतात्मा जवानांच्या नावाची कोनशीला बसविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिल्या महायुद्धापासून ते आजपर्यंत अनेक वीरांनी हौतात्म्य पत्करलं. याच शहिदांच्या स्मृतीचं अनोखं स्मारक साताऱ्यात उभारण्यात आलंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शहीद कर्नल संतोष महाडिक स्मृती उद्यानात आतापर्यंत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींचं जतन करण्यात आलंय. तसेच यानंतर जिल्ह्यातील शहीद जवानांचं पार्थिव या स्मृती उद्यानात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच हे उद्यान लवकरच सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याचेही सांगितले. (शुभम बोकडे, प्रतिनिधी)