Solapur Flood: बार्शीत आभाळ फाटलं, बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल; महापुराचे धडकी भरवणारे फोटो समोर

Last Updated:
बार्शीच्याच उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौन्दने, शेलगांव, भोयरे गावाला पावसाचा जोरदार फटका बसलाय.
1/7
- बार्शी तालुक्याला ढगफुटीसदृश्य पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय..रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय...तर शेताला तलावाचं.....हातातोंडाशी आलेलं उत्पन्न मातीमोल झालंय.
- बार्शी तालुक्याला ढगफुटीसदृश्य पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय..रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय...तर शेताला तलावाचं.....हातातोंडाशी आलेलं उत्पन्न मातीमोल झालंय.
advertisement
2/7
नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी....पिकं पिवळी पडलेली.....शेंगा नासून गेलेल्या....शेतकरी चिंतेत सापडला आहे.
नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी....पिकं पिवळी पडलेली.....शेंगा नासून गेलेल्या....शेतकरी चिंतेत सापडला आहे.
advertisement
3/7
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील ही परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी नाही...सध्या राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात थोड्याफार फरकानं हेच संकट दिसून येतंय.
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील ही परिस्थिती राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी नाही...सध्या राज्यातील 36 पैकी 30 जिल्ह्यात थोड्याफार फरकानं हेच संकट दिसून येतंय.
advertisement
4/7
बार्शीतील चांदणी नदीला पूर आल्यानं गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेलेत...त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या गावांचा संपर्क तुटलाय.
बार्शीतील चांदणी नदीला पूर आल्यानं गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेलेत...त्यामुळे आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव, कांदलगाव या गावांचा संपर्क तुटलाय.
advertisement
5/7
या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालंय. बार्शीच्याच उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौन्दने, शेलगांव, भोयरे गावाला पावसाचा जोरदार फटका बसलाय.
या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबीन आदी पिकांचे प्रचंड नुकसान झालंय. बार्शीच्याच उत्तर भागातील बेलगाव, मांडेगाव, ताडसौन्दने, शेलगांव, भोयरे गावाला पावसाचा जोरदार फटका बसलाय.
advertisement
6/7
वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. सप्टेंबर संपत आला तरी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे
वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. सप्टेंबर संपत आला तरी राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे
advertisement
7/7
.काही भागात 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस झालाय..त्याचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसलाय...त्यामुळे आता तरी सरकारनं तातडीनं पावलं उचलत प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी होत आहे.
.काही भागात 100 टक्क्यांपेक्षाही जास्त पाऊस झालाय..त्याचा प्रचंड फटका शेतकऱ्यांना बसलाय...त्यामुळे आता तरी सरकारनं तातडीनं पावलं उचलत प्रत्यक्ष मदत करावी अशी मागणी होत आहे.
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement