5 कोटींची किंमत 3,5 आणि 10 वर्षांनी किती असेल? आकडा पाहून व्हाल चकीत
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
महागाईचा तुमच्या पैशाच्या वास्तविक मूल्यावर कसा परिणाम होतो? जर तुमच्याकडे आज 5 कोटी असतील, तर 3, 5 आणि 10 वर्षांनी त्याची किंमत किती असेल? सध्याचा महागाई दर 6.21% आहे. जो कालांतराने तुमची बचत कमी करू शकतो. महागाईच्या गणनेच्या मदतीने, आपल्याला समजेल की 3 वर्षांत 5 कोटी रुपयांची किंमत किती असेल, 5 वर्षांनंतर त्याचा काय परिणाम होईल आणि 10 वर्षांत त्याचे मूल्य काय असेल.
चलनवाढीचा लॉग टर्म परिणाम : महागाईमुळे केवळ वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत नाहीत तर तुमच्या आर्थिक योजनांवरही परिणाम होतो. जर महागाई 6% वर राहिली, तर 10 वर्षांनंतर 10 लाख रुपयांची खरी खरेदी शक्ती फक्त 5.3 लाख रुपये असेल. म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणूक करताना चलनवाढीचा परिणाम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.
advertisement
महागाई आणि बँकेत जमा झालेले पैसे : महागाईमुळे बँकेत ठेवलेले पैसे हळूहळू त्यांची परचेजिंग पॉवर गमावतात. उदाहरणार्थ, जर तुमची बँक एफडी तुम्हाला 6% व्याज देत असेल. परंतु महागाई दर देखील 6% असेल, तर तुमची प्रत्यक्ष कमाई शून्य असेल. म्हणूनच, केवळ बचत करण्याऐवजी, महागाईवर मात करणाऱ्या गुंतवणूक ऑप्शनवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
चलनवाढीचा मालमत्तेवर होणारा परिणाम : महागाई केवळ रोख रकमेचे मूल्य कमी करत नाही तर मालमत्तेच्या किमतींवरही परिणाम करते. उदाहरणार्थ, 2000 मध्ये 10 लाख रुपयांना खरेदी करता येणारा फ्लॅट आज 1 कोटी रुपयांना असू शकतो. याचे कारण महागाई आहे, ज्यामुळे मालमत्तेच्या किमती वाढतात, परंतु पगारवाढ नेहमीच त्याच वेगाने होत नाही.
advertisement
advertisement
advertisement
Health Expenses and Inflation : महागाईमुळे आरोग्य सेवेचा खर्च सर्वात वेगाने वाढतो. 10 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये खर्च येणारा वैद्यकीय उपचार आज 3 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकतो. शिक्षणातील महागाईचा दरही सरासरी 8-10% आहे. आज 5 लाख रुपये असलेली डिग्री कोर्सची फी 10 वर्षांनी 10-12 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
advertisement
advertisement
महागाईची गणना करणे : 5 वर्षांनंतर त्यात पाच कोटींची किंमत ही कमी होऊन 3.63 कोटी एवढीच राहील. तर 10 वर्षांनंतर त्यात पाच कोटींची किंमत केवळ 2.64 कोटी एवढीच राहील. म्हणजेच भारतातील महागाई 6.21% वर राहिली तर तुमच्या पैशाचे मूल्य 10 वर्षांत जवळजवळ निम्मे होईल. म्हणूनच, तुमच्या गुंतवणूक योजनेचे नियोजन करताना महागाईचा परिणाम लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.