Success Story: गायीच्या शेणापासून सुरू केला व्यवसाय, वर्षाला 50 लाखांची कमाई, सावंत दाम्पत्याने कसं मिळवलं यश?

Last Updated:
दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
1/7
अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. उपासना सावंत आणि अजित सावंत या दाम्पत्याने निसर्गाशी एकरूप होत स्वतःचा खास व्यवसाय उभारला आहे.
अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. उपासना सावंत आणि अजित सावंत या दाम्पत्याने निसर्गाशी एकरूप होत स्वतःचा खास व्यवसाय उभारला आहे.
advertisement
2/7
दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
3/7
अजित सावंत मूळचे मनोरंजन क्षेत्रात दिग्दर्शनाच्या कामाशी जोडलेले होते, तर उपासना सावंत एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होत्या. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी त्यांची नेहमीच इच्छा होती.
अजित सावंत मूळचे मनोरंजन क्षेत्रात दिग्दर्शनाच्या कामाशी जोडलेले होते, तर उपासना सावंत एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत होत्या. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी त्यांची नेहमीच इच्छा होती.
advertisement
4/7
सुरुवातीला त्यांनी केकचा व्यवसाय सुरू केला, पण त्याचबरोबर काही वेगळं आणि समाजोपयोगी करता यावं, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. अशातच लॉकडाऊन आला आणि ऑरगॅनिक उत्पादनांची वाढती मागणी त्यांनी ओळखली.
सुरुवातीला त्यांनी केकचा व्यवसाय सुरू केला, पण त्याचबरोबर काही वेगळं आणि समाजोपयोगी करता यावं, यासाठीही ते सतत प्रयत्नशील होते. अशातच लॉकडाऊन आला आणि ऑरगॅनिक उत्पादनांची वाढती मागणी त्यांनी ओळखली.
advertisement
5/7
घराघरात रोज लावली जाणारी अगरबत्ती ही आरोग्यास अपायकारक रसायनांमुळे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाईच्या शेणापासून नैसर्गिक पद्धतीने अगरबत्ती बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी अजय सावंत यांनी विविध ठिकाणी जाऊन अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःची छोटी फॅक्टरी सुरू केली.
घराघरात रोज लावली जाणारी अगरबत्ती ही आरोग्यास अपायकारक रसायनांमुळे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाईच्या शेणापासून नैसर्गिक पद्धतीने अगरबत्ती बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी अजय सावंत यांनी विविध ठिकाणी जाऊन अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःची छोटी फॅक्टरी सुरू केली.
advertisement
6/7
गोशाळांतून मिळणाऱ्या गाईच्या शेणाचा वापर करून आणि नैसर्गिक सुगंध मिश्रित करून त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अगरबत्ती बाजारात आणली. सावंत दाम्पत्याचा विश्वास आहे की, जेव्हा आपण निसर्गाला हानी न पोहोचवता काम करतो, तेव्हा निसर्गही आपल्याला साथ देतो.
गोशाळांतून मिळणाऱ्या गाईच्या शेणाचा वापर करून आणि नैसर्गिक सुगंध मिश्रित करून त्यांनी पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी अगरबत्ती बाजारात आणली. सावंत दाम्पत्याचा विश्वास आहे की, जेव्हा आपण निसर्गाला हानी न पोहोचवता काम करतो, तेव्हा निसर्गही आपल्याला साथ देतो.
advertisement
7/7
आज त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना शुद्ध आणि सुरक्षित अगरबत्ती उपलब्ध होत आहे. त्यांच्या या कल्पक प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 50 लाखांपर्यंत पोहोचले आहे.
आज त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना शुद्ध आणि सुरक्षित अगरबत्ती उपलब्ध होत आहे. त्यांच्या या कल्पक प्रयत्नांना मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 50 लाखांपर्यंत पोहोचले आहे.
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement