Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, मार्चअखेर टेन्शन वाढलं, तिहेरी संकट, 72 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: मार्चअखेर महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मार्चअखेर उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचं संकट अधिक गडद होत असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी उष्णतेचा पारा चाळीशीच्या घरात असून बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: कोकणात उष्ण आणि दमट हवामान तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट अशी स्थिती असेल. आज 28 मार्च रोजीचं महाराष्ट्रातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर भागावर अस्मानी संकटाचा धोका कायम आहे. शुक्रवारी संध्याकाळी कोल्हापूर परिसरात विजांसह पावसाने हजेरी लावली. आज, शनिवारी हवामान कोरडे राहील. तापमान 35-38 अंशांपर्यंत जाईल. परंतु, 2 दिवसांत वारं फिरणार असून पुन्हा अवकाळीचा धोका वाढेल. 30 मार्चपासून सर्वच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अलर्ट दिला आहे.
advertisement
advertisement
विदर्भात अवकाळी संकटाचा धोका कायम आहे. आज काही भागात हवामान कोरडे राहील. अकोला, अमरावती या जिल्ह्यांत पारा 40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही भागात ताशी 30 ते 50 किमी वेगाच्या वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. तर रविवारपासून पाऊस संपूर्ण विदर्भाला अवकाळी आणि गारपीटचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement









