Mumbai Rain: श्रावणाच्या शेवटी वारं फिरलं, कोकणात पावसाचा जोर ओसरला, मुंबई-ठाण्याचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकणात गेल्या चार दिवसांत पावसानं थैमान घातलं. आता श्रावणाच्या शेवटी हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कोकण पट्ट्यात व मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचणे, निचऱ्याची गती कमी होणे आणि वाहतुकीला अडथळे अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली आहे. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हवामानाचा बदललेला चेहरा नागरिकांसाठी दिलासा ठरत आहे.
advertisement
मुंबई शहर व उपनगरांमध्ये 22 ऑगस्ट रोजी कोणताही हवामान अलर्ट जारी केलेला नाही. सकाळपासून रिमझिम पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून पडल्या असल्या तरी मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत सुरू असून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. हवेत गारवा जाणवत असून वातावरण सुखद झाले आहे.
advertisement
advertisement
advertisement
रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आज कोणताही धोका नाही. हवामान स्थिर असून हलक्या सरी पडत आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.











