थरथरते हात अन् द्राक्षांचा चिखल, गारपिटीनं होतं नव्हतं जमीनदोस्त केलं, ढसाढसा रडला शेतकरी!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सांगलीतील भिवघाट परिसरात गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. विठ्ठल कापसे यांच्या द्राक्षबागेचे नुकसान पाहून शेतकऱ्यांची व्यथा वाढली आहे.
सांगली, आसिफ मुरसल : शेतकऱ्याच्या घामाचा सुगंध ज्या द्राक्षाच्या बागांमधून दरवळत होता, तिथे आज फक्त सडलेल्या द्राक्षांचा खच आणि बळीराजाच्या डोळ्यांतील पाणी पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील भिवघाट आणि परिसरातील गावांना काल सायंकाळी निसर्गाच्या अशा काही भीषण कोपाचा सामना करावा लागला, ज्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत अवघ्या दीड तासात मातीमोल केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









