Weather Alert: मुंबईकर संकट टळलं नाही, कोकणात वारं फिरलं, आज धो धो कोसळणार, IMD चा हायअलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: कोकण किनारपट्टीवर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर वाढला आहे. आज पुन्हा कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला असून मुंबई-ठाण्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्याची सुरुवातीलाच कोकणात पवसाचा जोर वाढला आहे. आजही कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरासाठी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे, तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे मुंबई परिसरात ठिकठिकाणी रिमझिम ते मुसळधार सरी तर कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळपासून वातावरण ढगाळ राहिले आहे. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही भागात अचानक जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तापमान 25 ते 30 अंश सेल्सियसच्या दरम्यान राहील. वाऱ्याचा वेग 15 ते 20 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईत आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. दिवसभर हलक्या सरींसह दुपारनंतर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाण्यातील खाडी भागात पाणी साचण्याचा धोका असल्याने नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. तापमान 24 ते 29 अंश सेल्सियस असेल आणि आर्द्रता 85 टक्क्यांच्या घरात राहील.
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. या भागांत दिवसभर मुसळधार पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून डोंगरी व किनारी भागात पाणी साचणे, दरड कोसळणे यांसारखे धोके संभवतात. तापमान 24 ते 28 अंश सेल्सियसदरम्यान राहील, तर वाऱ्याचा वेग 20 -25 किमी प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.











