Weather Alert: 48 तास धोक्याचे! कोकणात पावसाचा जोर, मुंबईला यलो, तर ठाण्यात हायअलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Rain: सप्टेंबरच्या पहिल्याच आठवाड्यात कोकणातील पावसाचा जोर कायम आहे. आज ठाण्यासह 3 जिल्ह्यांना हायअलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सप्टेंबर महिना सुरू होऊन अवघे चार दिवस झाले असले तरी कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळत आहेत तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, मुंबई व परिसरात विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
पालघर जिल्ह्यालाही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे येथे जमिनीतील ओल वाढली आहे. आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी रिमझिमसरी सुरू आहेत आणि दुपारनंतर जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 35 किमी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
रायगड जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-ओढे खळखळत आहेत. आजदेखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 35 किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
advertisement


