Mumbai Red Alert: दहीहंडी दिवशी अस्मानी संकट! मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पाऊस, IMD कडून रेड अलर्ट!

Last Updated:
Mumbai Rain: मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.
1/5
आज, 16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडीचा जल्लोष साजरा होत आहे. मुंबई आणि कोकणातही उत्साहाची लाट असली तरी या सोहळ्यावर अस्मानी संकटाचं विघ्न येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिले असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम असून, आजही अनेक ठिकाणी पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.
आज, 16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडीचा जल्लोष साजरा होत आहे. मुंबई आणि कोकणातही उत्साहाची लाट असली तरी या सोहळ्यावर अस्मानी संकटाचं विघ्न येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट दिले असून, जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम असून, आजही अनेक ठिकाणी पावसाचा प्रभाव जाणवणार आहे.
advertisement
2/5
मुंबई शहर आणि उपनगरांना आज रेड अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान 28°C असेल. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमीपर्यंत जाऊ शकतो. उच्च भरतीमुळे समुद्रकिनारी जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच दहीहंडी बघायला जाण्यापूर्वी पावसाची स्थिती पाहावी लागेल.
मुंबई शहर आणि उपनगरांना आज रेड अलर्ट जारी केला आहे. दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, कमाल तापमान 28°C असेल. वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किमीपर्यंत जाऊ शकतो. उच्च भरतीमुळे समुद्रकिनारी जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच दहीहंडी बघायला जाण्यापूर्वी पावसाची स्थिती पाहावी लागेल.
advertisement
3/5
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही भागांना आज ऑरेंज अलर्ट आहे. दिवसात सतत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 27°C आणि किमान 24°C राहील, वाऱ्याचा वेग 35-45 किमी प्रतितास पोहोचू शकतो. काही ठिकाणी पाणी साचण्याचा धोका असून त्याचा वाहतुकीवरही परिणाम होईल. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही भागांना आज ऑरेंज अलर्ट आहे. दिवसात सतत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 27°C आणि किमान 24°C राहील, वाऱ्याचा वेग 35-45 किमी प्रतितास पोहोचू शकतो. काही ठिकाणी पाणी साचण्याचा धोका असून त्याचा वाहतुकीवरही परिणाम होईल. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
4/5
मुंबई ठाण्यासह आज पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट आहे. दिवसभर हलका ते मध्यम पाऊस पडणार असून, काही भागात विजांच्या कडकडाटासह सरी येऊ शकतात. कमाल तापमान 29°C आणि किमान 25°C राहील. वाऱ्याचा वेग ताशी 25-30 किमी राहण्याची शक्यता आहे.
मुंबई ठाण्यासह आज पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट आहे. दिवसभर हलका ते मध्यम पाऊस पडणार असून, काही भागात विजांच्या कडकडाटासह सरी येऊ शकतात. कमाल तापमान 29°C आणि किमान 25°C राहील. वाऱ्याचा वेग ताशी 25-30 किमी राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. रायगडला आज रेड अलर्ट असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे, तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट आहे. कमाल तापमान 27-28°C आणि किमान 24-25°C राहील. वाऱ्याचा वेग 30-50 किमी प्रतितास राहू शकतो. मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. रायगडला आज रेड अलर्ट असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी आहे, तर सिंधुदुर्गला यलो अलर्ट आहे. कमाल तापमान 27-28°C आणि किमान 24-25°C राहील. वाऱ्याचा वेग 30-50 किमी प्रतितास राहू शकतो. मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement