Weather Alert: गौरी-गणपतीच्या विसर्जनाला वरुणराजाची हजेरी, मुंबईत आज जोरधार, कोकणात यलो अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणात पावसाचा जोर वाढला असून आज 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्याची सुरुवात मुंबई आणि कोकणासाठी जोरदार पावसाने झाली आहे. 2 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या ठिकाणी पावसाचा जोर राहील. काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामन विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाचा जोर वाढलेला असून आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात विशेषतः डोंगरी भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तापमान 24 ते 28 अंश सेल्सियस आणि आर्द्रता 85 टक्के पेक्षा जास्त असेल.











