Weather Alert: महाराष्ट्रावर संकटाचे ढग गडद, वादळी पाऊस होणार; 33 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजीही राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांना येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून थैमान घातले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशाच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजीही राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पाहुयात 26 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. बुलढाणा, चंद्रपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement










