Weather Alert : महाराष्ट्रात शुक्रवारी पुन्हा वादळी पाऊस, 13 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
31 ऑक्टोबर रोजीही राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
1/7
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. 31 ऑक्टोबर रोजीही राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. 31 ऑक्टोबर रोजीही राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाहुयात 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण आणि मुंबई परिसरातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि मुंबई परिसरातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.
advertisement
4/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वच ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. तर अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. तर अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
7/7
राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात अनेक बदल घडून आल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची आणि शेतमालाची काळजी घेणे आवश्यक आहे.
राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणात अनेक बदल घडून आल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची आणि शेतमालाची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement