Weather Alert: महाराष्ट्राला पुढील 4 दिवस धोक्याचे! हवामान विभागाचा रेड अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे सावट कायम राहणार आहे.
advertisement
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 26 आणि 24 अंश सेल्सिअस असेल. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement