Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा दिवस पावसाचे! विजांच्या कडकडाटासह बरसणार, या जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
6 नोव्हेंबर रोजीही तीच स्थिती कायम राहणार आहे. काही भागांत तापमानात घट जाणवणार आहे. तर कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/7
मागील काही दिवसांपासून राज्यभरात वातावरणात विविधता दिसून येत आहे. 6 नोव्हेंबर रोजीही तीच स्थिती कायम राहणार आहे. काही भागांत तापमानात घट जाणवणार आहे. तर कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 6 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात वातावरणात विविधता दिसून येत आहे. 6 नोव्हेंबर रोजीही तीच स्थिती कायम राहणार आहे. काही भागांत तापमानात घट जाणवणार आहे. तर कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 6 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान 22 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागांत दिवसा वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या भागांत दिवसा वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
नाशिकमधील तापमानात घट झालेली दिसून येत आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
नाशिकमधील तापमानात घट झालेली दिसून येत आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहील. नागपूरमधील कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहील. नागपूरमधील कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
7/7
राज्यातील विविध भागांत सध्या संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे. रात्री आणि सकाळच्या सुमारास वातावरणात गारठा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणाचा विचार करून पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील विविध भागांत सध्या संमिश्र वातावरण बघायला मिळत आहे. रात्री आणि सकाळच्या सुमारास वातावरणात गारठा वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलत्या वातावरणाचा विचार करून पिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement