उद्या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी, चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; एक चूक करेल मोठं नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उद्या 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला 'विकट संकष्टी चतुर्थी' म्हणतात. गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी अनेक भक्त या दिवशी कडक उपवास करतात. मात्र, संकष्टीचा उपवास करताना केवळ काय खावे हे महत्त्वाचे नसून, काय खाऊ नये याचेही काही कडक नियम शास्त्रात सांगितले आहेत.
उद्या 5 एप्रिल 2026, रविवार रोजी हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील या चतुर्थीला 'विकट संकष्टी चतुर्थी' म्हणतात. गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी अनेक भक्त या दिवशी कडक उपवास करतात. मात्र, संकष्टीचा उपवास करताना केवळ काय खावे हे महत्त्वाचे नसून, काय खाऊ नये याचेही काही कडक नियम शास्त्रात सांगितले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
धान्य आणि डाळी: संकष्टीचा उपवास हा 'फलाहार' किंवा 'नक्त' अशा स्वरूपाचा असतो. यामध्ये गहू, तांदूळ, मैदा किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळी खाऊ नयेत. चुकूनही भात किंवा चपातीचे सेवन केल्यास उपवास मोडला जातो, असे मानले जाते. त्याऐवजी साबुदाणा, वरीचे तांदूळ किंवा राजगिरा यांसारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
तुळशीचा वापर टाळा: उपवासाच्या पदार्थात किंवा बाप्पाच्या नैवेद्यात विसरूनही तुळशीच्या पानाचा वापर करू नका. गणपतीच्या पूजेत तुळस वर्ज्य आहे. प्रसादासाठी किंवा जेवणात तुळस घातल्याने बाप्पा नाराज होतात, असे शास्त्र सांगते. त्याऐवजी भरपूर दुर्वा अर्पण करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









