संक्रांतीच्या दिवशी हातात किती बांगड्या घालाव्या, विषम नंबरमधेच का घातल्या जातात बांगड्या?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
मकर संक्रांतीला महिलांनी विषम संख्येच्या हिरव्या बांगड्या भराव्यात, यामुळे शक्ती तत्त्व जागृत होते आणि सौभाग्य वाढते अशी परंपरा महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या पाळली जाते.
मकर संक्रांतीचा सण सुवासिनींसाठी आनंदाचा आणि सौभाग्याचा मानला जातो. या दिवशी काळी साडी, हलव्याचे दागिने आणि वाण लुटण्यासोबतच 'शृंगाराला' विशेष महत्त्व असते. दागिन्यांमध्ये बांगड्यांना सौभाग्याचे लेणे म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, संक्रांतीला बांगड्या भरताना एक खास नियम पाळला जातो? अनेक ठिकाणी महिला एका हातापेक्षा दुसऱ्या हातात एक बांगडी जास्त घालतात.
advertisement
विषम संख्येचे महत्त्व: हिंदू धर्मात 'विषम' संख्या ही शक्तीचे प्रतीक मानली जाते. संक्रांतीच्या दिवशी महिला जेव्हा बांगड्या भरतात, तेव्हा दोन्ही हातांतील बांगड्यांची एकूण संख्या विषम असावी असा संकेत असतो. उदाहरणार्थ, एका हातात 11 आणि दुसऱ्या हातात 12 बांगड्या घातल्या जातात, जेणेकरून एकूण संख्या 23 होईल. ही विषम संख्या स्त्रीमधील 'शक्ती' तत्त्व जागृत करते, असे मानले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
परंपरेचे पालन: महाराष्ट्रात अनेक कुटुंबांत पिढ्यानपिढ्या ही पद्धत पाळली जाते. सणासुदीला पूर्ण शृंगार करताना 'जोड' पेक्षा 'बेजोड' किंवा विषम संख्येला शुभ मानण्याची ही एक सांस्कृतिक रीत आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)









